शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:30 IST

Bihar Assembly Election Votes: महाआघाडीत राजदने व्यक्तिगत स्तरावर सर्वाधिक जागा जिंकून आपले स्थान निश्चित केले असले तरी, संपूर्ण आघाडीला बहुमत मिळवता आले नाही.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी अनेक राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. राजद नेते तेजस्वी प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते, या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे काँग्रेस पक्षाचा अत्यंत निराशाजनक 'स्ट्राइक रेट' आणि तेजस्वी यादव यांचा काँग्रेसवरील प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवणे हे असल्याचे सांगितले जात आहे. 

महाआघाडीत राजदने व्यक्तिगत स्तरावर सर्वाधिक जागा जिंकून आपले स्थान निश्चित केले असले तरी, संपूर्ण आघाडीला बहुमत मिळवता आले नाही. राजदला मतदारांचा भाजपपेक्षाही जास्त पाठिंबा मिळाला आहे. परंतू, त्यांच्या जागा कमी आल्या आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार राजदला २२.७३ टक्के मतदान झाले आहे, तर भाजपला २०.८० टक्के मतदान झाले आहे. नितीशकुमार यांच्या जेडीयुला १८.८३ टक्के मतदान झाले आहे. देशपातळीवरील पक्ष काँग्रेसला केवळ 8.56 टक्के मते मिळाली आहेत. ही सर्वात निराशाजनक बाब ठरली आहे. 

महाआघाडीमध्ये काँग्रेसला ६० हून अधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस पक्षाने अत्यंत कमी जागांवर विजय मिळवला आहेच, परंतू मतदानही कमीच घेतले आहे. ज्या जागा काँग्रेसला देण्यात आल्या, त्यापैकी बहुतांश जागांवर काँग्रेसला मतदारांना आपल्याकडे वळवण्यात अपयश आल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. 

बिहारमध्ये भाजपा जवळपास ९६ जागांवर आघाडीवर आहे, तर जदयू ८४ जागांवर आघाडीवर आहे. परंतू. यांच्यापेक्षा कितीतरी मते जास्त मिळविणारा राजद मात्र २४ वरच अडकला आहे. याचाच अर्थ राजदला जिथे पडली तिथे खूप मते पडली आहेत, परंतू जिथे हवी होती तिथे कमी मते पडल्याने त्याचा फायदा भाजपा आणि जदयूला झालेला आहे. NDA ने २०० हून अधिक जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 

तेजस्वींना आता काय करावे लागेल?तेजस्वी यादव यांनी त्यांच्या 'जॉब्स' आणि 'युवा' या घोषणांच्या आधारावर राज्यात एक नवीन लाट निर्माण केली असली तरी, लालू प्रसाद यादव यांच्या जुन्या 'जंगलराज'च्या प्रतिमेपासून ते पूर्णपणे दूर राहू शकले नाहीत. तसेच, एका कमकुवत पक्षावर अधिक अवलंबून राहिल्याने त्यांना मोठा फटका बसला. या निकालानंतर तेजस्वी यादव यांना आता आपल्या पक्षाची संघटन क्षमता वाढवावी लागेल आणि भविष्यात मित्रपक्षांची निवड अधिक विचारपूर्वक करावी लागणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Despite More Votes, Why Tejashwi's Alliance Lost to BJP?

Web Summary : Tejashwi Yadav's alliance lost despite more votes than BJP due to Congress's poor performance. RJD secured most seats but lacked majority. Reliance on a weak Congress and lingering 'Jungle Raj' image hindered Tejashwi's victory. He needs stronger organization and better alliance choices.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Tejashwi Yadavतेजस्वी यादवcongressकाँग्रेसBJPभाजपा