शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! लडाखमध्ये चिनी सैनिकाला पकडले; चौकशीत महत्वाचे कागदपत्र सापडले

By हेमंत बावकर | Updated: October 19, 2020 15:31 IST

india china faceoff : भारत आणि चीनमध्ये मोठा तणाव आहे. यामुळे ही घटना चुकून घडणे तसे अशक्य आहे. प्रोटोकॉलनुसार अजानतेपणी सीमा पार केल्यास शत्रू राष्ट्राच्या सैनिकांना परत त्यांच्या देशाकडे सोपविले जाते. 

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने आज मोठी कारवाई केली आहे. लडाखच्या पूर्वेकडील देमचोक सेक्टरमधून एका चिनी सैनिकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरु आहे. या चिनी सैनिकाकडे महत्वाचे कागदपत्र सापडले आहेत. 

वृत्त संस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी सकाळी चिनी सैनिकाला ताब्यात घेण्यात आले. त्याने चुकून भारतीय हद्दीत प्रवेशे केला, असे सांगण्यात येत आहे. यामुळे प्रोटोकॉलनुसार त्याला पुन्हा चीनच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे. 

भारतीय सैन्याकडून सुरु असलेल्या चिनी सैनिकाच्या चौकशीमध्ये तो एकटाच भारतीय हद्दीत कसा घुसला असे विचारले जात आहे. हेरगिरी करण्याच्या इराद्याने त्याने भारतीय हद्दीत प्रवेश केला का? की वाट चुकला याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्य पुढील कारवाई करणार आहे. प्रोटोकॉलनुसार अजानतेपणी सीमा पार केल्यास शत्रू राष्ट्राच्या सैनिकांना परत त्यांच्या देशाकडे सोपविले जाते. 

दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोरभारत आणि चीनमध्ये मोठा तणाव आहे. यामुळे ही घटना चुकून घडणे तसे अशक्य आहे. देमचोक, पेंगाँग झीलचा उत्तर आणि दक्षिणेकडचा किनारा डोकलाम या भागात तणावाचे वातावरण आहे. डोकलाम वादावेळी हिंसात्मक चकमक झाली होती. यामुळे दोन्ही बाजुच्या सैन्याचा मोठा फौजफाटा एलएसीवर तैनात आहे. 

दोन्हा देशांमध्ये सीमेवरून वाद असल्याने नेहमी अशा घटना घडत असतात. मात्र, ते चिनी नागरिक असतात. सैनिक नसतो. भारताने वेळोवेळी चिनी नागरिकांना पुन्हा चीनच्या ताब्यात दिले आहे. या तणाव काळात एक चिनी जोडपे रस्ता चुकले होते. भारतीय सैन्याने त्यांना पाहून आधी विचारपूस केली नंतर त्यांना अन्नपाणी देत चीनच्या सैन्याकडे सोपविले. या काळात भारतीय जवानांनी त्यांची पुरेपूर काळजी घेतली. 

प्रोटोकॉल काय सांगतोप्रोटोकॉलनुसार जर कोणी अजानतेपणी सीमापार करून येत असेल तर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली जाते. मात्र, चीनचा विश्वासघातकीपणा एवढा वाढलेला आहे की चीनने काहीतरी आगळीक करण्यासाठीदेखील सैनिकाला पाठविण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात चीनने अरुणाचल प्रदेशच्या पाच तरुणांचे अपहरण केले होते. भारताच्या आरोपांवरही चीन मूग गिळून गप्प होता. मात्र, नंतर काही दिवसांनी चीनने या तरुणांना सोडून दिले. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानladakhलडाखchinaचीन