शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
3
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
4
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
5
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
6
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
7
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
8
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
9
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
10
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
11
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
12
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
13
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
14
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
15
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
16
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
17
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
18
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

Baba Ramdev: “भारत सरकारला जे संशोधन जमलं नाही, ते पतंजलीने करून दाखवलं”: बाबा रामदेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 14:17 IST

Baba Ramdev: आत्मनिर्भर भारताची प्रेरणा घेऊनच पतंजलीची वाटचाल सुरू आहे. पतंजली ब्रँड नसून, आंदोलन असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्दे२ जणांपासून सुरू झालेला योगा आता २०० कोटी लोकं करतातआगामी ५ वर्षांत आणखी ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणारपरदेशी कंपन्यांच्या एकाधिकारशाही, मक्तेदारीला पतंजलीने आव्हान दिले

हरिद्वार: अॅलोपॅथी उपचार पद्धतीवर केलेल्या वक्तव्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) चर्चेत आहेत. पतंजली योगपीठ (Patanjali Yogpeeth) येथील एका कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव यांनी पतंजली कंपनीची ध्येयधोरणे, आगामी वाटचाल, यशस्वी टप्पे यांविषयी माहिती दिली. भारत सरकारला जे संशोधन आतापर्यंत केलेले नाही, ते पतंजलीत करण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारताची प्रेरणा घेऊनच पतंजलीची वाटचाल सुरू आहे. पतंजली ब्रँड नसून, आंदोलन असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. (baba ramdev claims that patanjali challenged the monopoly of foreign companies)

उत्तर प्रदेशात भाजपविरोधी संकल्प मोर्चात बिघाडी; आघाडी करण्यास ‘आप’चा नकार

बाबा रामदेव यांनी पुढे बोलताना सांगितले की, परदेशी कंपन्यांच्या एकाधिकारशाही, मक्तेदारीला पतंजलीने आव्हान दिले आहे. देशाच्या समृद्धीसाठी पतंजलीने मोठे योगदान दिले असून, भविष्यात एक विद्यापीठ सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आतापर्यंत पतंजलीने ५ लाख जणांना नोकऱ्या दिल्या असून, आगामी ५ वर्षांत आणखी ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे बाबा रामदेव यांनी नमूद केले. 

संशोधनावर आधारित १०० औषधे

आम्ही दोन व्यक्तींना योग, योगासने शिकवण्यास सुरुवात केली होता. आता २०० देशातील १०० ते २०० कोटी जनसंख्या सरासरी दररोज योगासने करतात, असेही बाबा रामदेव यांनी नमूद केले. पतंजलीमध्ये संशोधनावर अधिक भर दिला जातो. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त औषधे सखोल आणि व्यापक संशोधनानंतर बाजारात सादर करण्यात आली आहेत. पतंजलीमध्ये ५०० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ काम करतात. पतंजलीच्या सेवांवर आम्हांला अभिमान आहे. आताच्या घडीला समाजातील एक मोठा वर्ग पतंजलीशी जोडला गेला आहे, असे सांगत पतंजलीच्या औषधांमुळे असाध्य रोग, आजार बरे झाल्याचा दावा बाबा रामदेव यांनी यावेळी बोलताना केला आहे.

BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम

संशोधन, आरोग्य आणि शिक्षणावर भर

भविष्यात पतंजलीचा संशोधन, आरोग्य आणि शिक्षणावर भर राहील. यासह कृषी क्षेत्रातही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.  तसेच पतंजली ग्रुपचा टर्नओव्हर २५ हजार कोटी रुपये असून, आगामी कालावधीत तो २ हजार २५ कोटी रुपयांपर्यंत नेण्याच्या योजनेवर काम सुरू आहे, असे बाबा रामदेव यांनी नमूद केले आहे.  

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजलीharidwar-pcहरिद्वार