शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

Baba Ramdev: “भारत सरकारला जे संशोधन जमलं नाही, ते पतंजलीने करून दाखवलं”: बाबा रामदेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 14:17 IST

Baba Ramdev: आत्मनिर्भर भारताची प्रेरणा घेऊनच पतंजलीची वाटचाल सुरू आहे. पतंजली ब्रँड नसून, आंदोलन असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्दे२ जणांपासून सुरू झालेला योगा आता २०० कोटी लोकं करतातआगामी ५ वर्षांत आणखी ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणारपरदेशी कंपन्यांच्या एकाधिकारशाही, मक्तेदारीला पतंजलीने आव्हान दिले

हरिद्वार: अॅलोपॅथी उपचार पद्धतीवर केलेल्या वक्तव्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) चर्चेत आहेत. पतंजली योगपीठ (Patanjali Yogpeeth) येथील एका कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव यांनी पतंजली कंपनीची ध्येयधोरणे, आगामी वाटचाल, यशस्वी टप्पे यांविषयी माहिती दिली. भारत सरकारला जे संशोधन आतापर्यंत केलेले नाही, ते पतंजलीत करण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारताची प्रेरणा घेऊनच पतंजलीची वाटचाल सुरू आहे. पतंजली ब्रँड नसून, आंदोलन असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. (baba ramdev claims that patanjali challenged the monopoly of foreign companies)

उत्तर प्रदेशात भाजपविरोधी संकल्प मोर्चात बिघाडी; आघाडी करण्यास ‘आप’चा नकार

बाबा रामदेव यांनी पुढे बोलताना सांगितले की, परदेशी कंपन्यांच्या एकाधिकारशाही, मक्तेदारीला पतंजलीने आव्हान दिले आहे. देशाच्या समृद्धीसाठी पतंजलीने मोठे योगदान दिले असून, भविष्यात एक विद्यापीठ सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आतापर्यंत पतंजलीने ५ लाख जणांना नोकऱ्या दिल्या असून, आगामी ५ वर्षांत आणखी ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे बाबा रामदेव यांनी नमूद केले. 

संशोधनावर आधारित १०० औषधे

आम्ही दोन व्यक्तींना योग, योगासने शिकवण्यास सुरुवात केली होता. आता २०० देशातील १०० ते २०० कोटी जनसंख्या सरासरी दररोज योगासने करतात, असेही बाबा रामदेव यांनी नमूद केले. पतंजलीमध्ये संशोधनावर अधिक भर दिला जातो. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त औषधे सखोल आणि व्यापक संशोधनानंतर बाजारात सादर करण्यात आली आहेत. पतंजलीमध्ये ५०० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ काम करतात. पतंजलीच्या सेवांवर आम्हांला अभिमान आहे. आताच्या घडीला समाजातील एक मोठा वर्ग पतंजलीशी जोडला गेला आहे, असे सांगत पतंजलीच्या औषधांमुळे असाध्य रोग, आजार बरे झाल्याचा दावा बाबा रामदेव यांनी यावेळी बोलताना केला आहे.

BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम

संशोधन, आरोग्य आणि शिक्षणावर भर

भविष्यात पतंजलीचा संशोधन, आरोग्य आणि शिक्षणावर भर राहील. यासह कृषी क्षेत्रातही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.  तसेच पतंजली ग्रुपचा टर्नओव्हर २५ हजार कोटी रुपये असून, आगामी कालावधीत तो २ हजार २५ कोटी रुपयांपर्यंत नेण्याच्या योजनेवर काम सुरू आहे, असे बाबा रामदेव यांनी नमूद केले आहे.  

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजलीharidwar-pcहरिद्वार