शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Baba Ramdev: “भारत सरकारला जे संशोधन जमलं नाही, ते पतंजलीने करून दाखवलं”: बाबा रामदेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 14:17 IST

Baba Ramdev: आत्मनिर्भर भारताची प्रेरणा घेऊनच पतंजलीची वाटचाल सुरू आहे. पतंजली ब्रँड नसून, आंदोलन असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्दे२ जणांपासून सुरू झालेला योगा आता २०० कोटी लोकं करतातआगामी ५ वर्षांत आणखी ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणारपरदेशी कंपन्यांच्या एकाधिकारशाही, मक्तेदारीला पतंजलीने आव्हान दिले

हरिद्वार: अॅलोपॅथी उपचार पद्धतीवर केलेल्या वक्तव्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) चर्चेत आहेत. पतंजली योगपीठ (Patanjali Yogpeeth) येथील एका कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव यांनी पतंजली कंपनीची ध्येयधोरणे, आगामी वाटचाल, यशस्वी टप्पे यांविषयी माहिती दिली. भारत सरकारला जे संशोधन आतापर्यंत केलेले नाही, ते पतंजलीत करण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारताची प्रेरणा घेऊनच पतंजलीची वाटचाल सुरू आहे. पतंजली ब्रँड नसून, आंदोलन असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. (baba ramdev claims that patanjali challenged the monopoly of foreign companies)

उत्तर प्रदेशात भाजपविरोधी संकल्प मोर्चात बिघाडी; आघाडी करण्यास ‘आप’चा नकार

बाबा रामदेव यांनी पुढे बोलताना सांगितले की, परदेशी कंपन्यांच्या एकाधिकारशाही, मक्तेदारीला पतंजलीने आव्हान दिले आहे. देशाच्या समृद्धीसाठी पतंजलीने मोठे योगदान दिले असून, भविष्यात एक विद्यापीठ सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आतापर्यंत पतंजलीने ५ लाख जणांना नोकऱ्या दिल्या असून, आगामी ५ वर्षांत आणखी ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे बाबा रामदेव यांनी नमूद केले. 

संशोधनावर आधारित १०० औषधे

आम्ही दोन व्यक्तींना योग, योगासने शिकवण्यास सुरुवात केली होता. आता २०० देशातील १०० ते २०० कोटी जनसंख्या सरासरी दररोज योगासने करतात, असेही बाबा रामदेव यांनी नमूद केले. पतंजलीमध्ये संशोधनावर अधिक भर दिला जातो. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त औषधे सखोल आणि व्यापक संशोधनानंतर बाजारात सादर करण्यात आली आहेत. पतंजलीमध्ये ५०० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ काम करतात. पतंजलीच्या सेवांवर आम्हांला अभिमान आहे. आताच्या घडीला समाजातील एक मोठा वर्ग पतंजलीशी जोडला गेला आहे, असे सांगत पतंजलीच्या औषधांमुळे असाध्य रोग, आजार बरे झाल्याचा दावा बाबा रामदेव यांनी यावेळी बोलताना केला आहे.

BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम

संशोधन, आरोग्य आणि शिक्षणावर भर

भविष्यात पतंजलीचा संशोधन, आरोग्य आणि शिक्षणावर भर राहील. यासह कृषी क्षेत्रातही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.  तसेच पतंजली ग्रुपचा टर्नओव्हर २५ हजार कोटी रुपये असून, आगामी कालावधीत तो २ हजार २५ कोटी रुपयांपर्यंत नेण्याच्या योजनेवर काम सुरू आहे, असे बाबा रामदेव यांनी नमूद केले आहे.  

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजलीharidwar-pcहरिद्वार