शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

भरल्या ताटावरुन अटलजी उठले अन् लखनौ विमान अपहरणातील 48 भारतीयांचा जीव वाचला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 8:57 AM

देशात रामजन्मभूमीचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी अटलजी लखनौ येथून खासदार होते. वाजपेयी लखनौला आल्यानंतर नेहमीच मीराबाई रोड येथील विश्राम निवासात राहात होते. एकदा

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देश शोक सागरात बुडाला आहे. राजकीय वर्तुळातील नेते आणि सर्वचजण त्यांच्यासोबतच्या आठवणी जागवत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत. तसेच त्यांच्या कार्यकाळातील आठवणीही सांगण्यात येत आहेत. अटलजींचे राजकीय मित्र भाजपा नेते लालजी टंडन यांनी एक किस्सा सांगितला आहे. त्यामध्ये, अटलबिहारी यांनी कशाप्रकारे भरल्या ताटावरुन उठत 48 प्रवाशांचा जीव वाचवला होता, हा प्रसंग टंडन यांनी सांगितला.

Atal Bihari Vajpayee : कार्यकर्ता खाली पेट नही सोया...

देशात रामजन्मभूमीचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी अटलजी लखनौ येथून खासदार होते. वाजपेयी लखनौला आल्यानंतर नेहमीच मीराबाई रोड येथील विश्राम निवासात राहात होते. एकदा प्रवासातील शेवटच्यादिवशी अटलजी रात्री जेवण करत होते. त्यानंतर त्यांना दिल्लीला जायचे होते. त्याचवेळी लखनौचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि राज्यपाल मोतीलाल वोरा यांचे सल्लागार धावतच अटलबिहारी यांच्याकडे आले होते. मात्र, अटलजी जेवण करत होते, त्यामुळे जेवणानंतरच त्यांची भेट होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांना विश्रामगृहातून सांगण्यात आले. मात्र, भेट अत्यंत गरजेची असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दरवाजा उघडून थेट अटलजींच्या खोलीत प्रवेश केला. जिल्हाधिकाऱ्यांना पाहून अटलजी आश्चर्यचकित झाले अन् म्हणाले, बोला साहेब कसं काय येणं केलं ?

Atal Bihari Vajpayee : भाजपा-शिवसेना युतीचे अटलजी होते शिल्पकार 

जिल्हाधिकाऱ्यांनी घाबरलेल्या अवस्थेतच प्रसंग सांगायला सुरुवात केली. अमौसी विमानतळावर एका युवकाने विमानाचे अपहरण केले असून त्याच्या हातात बॉम्ससदृश्य वस्तू आहे. विमान अपहरणकर्त्याने विमान बॉम्बने उडविण्याची धमकी दिली आहे. मात्र, जर अटलबिहारी वाजपेयी आले, तर सर्व प्रवाशांना सोडून देईल असेही या युवकाने सांगितल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले. त्यावेळी, तेथेच उभे असलेल्या लालजी टंडन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न केला. तुम्ही अटलींना तेथे घेऊन जाल, पण तुम्हाला त्यांच्या सुरक्षेची काळजी नाही का ?. जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडून उत्तर येण्यापूर्वीच वाजपेयींनी अर्ध्या ताटावरुन उठत जिल्हाधिकाऱ्यांसोबत जाण्याची तयारी सुरु केली. 

Atal Bihari Vajpayee : अग्रलेख - स्टेटस्मन अटलजी

Atal Bihari Vajpayee : मीडियासाठी एक आदर्श पंतप्रधान

अटलबिहारी वाजयेपी, लालजी टंडन, जिल्हाधिकारी आणि वोरा यांचे सल्लागार हे चारजण त्या युवकाला भेटायला गेले. प्रथम युवकास अटलजींनी विमानतळ टॉवरवरुन विमानात संपर्क केला. मात्र, युवकाने अटलबिहारी यांचा आवाज ओळखत नसून त्यांनी विमानात येऊन भेटण्याची मागणी केली. यावेळीही सोबतच्या सहकाऱ्यांनी अटलजींना विमानात न जाण्याचे सूचवले. मात्र, अटलजींनी कशाचीही तमा न बाळगता, लखनौ विमानतळावर आपली कार नेली. सर्वप्रथम ललजी टंडन यांनी विमानातील तरुणाची भेट घेतली. त्यानंतर, अटलबिहारी वाजपेयीही विमानात जाऊन युवकाला भेटले. दोघांमध्ये काही मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर, लालजी टंडन यांनी तरुणाला अटलजींचे चरण स्पर्श करण्याचे सूचवले. त्यामुळे अपहरणकर्ता युवक अटलींचे पाय पकडण्यासाठी पुढे सरसावला. त्याचवेळेस, पोलिसांनी तरुणाच्या दंडाला कचकाटून पडकले. तरुणाला ताब्यात घेतले. तरुणानेही लगेचच, जवळील बॉम्बसदृश्य वस्तूचे तुकडे-तुकडे करुन ते सुतळीचे असल्याचे सांगितले. तसेच, माझ्याकडे कुठलाही बॉम्ब नसून केवळ रामजन्मभूमीवरुन देशात किती आक्रोश आहे, हेच मला अटलींना दाखवून द्यायचे होते, असे या युवकाने म्हटले होते. दरम्यान, या विमानातून 48 प्रवासी प्रवास करत होते. तर, अटलजींनी विमानातील प्रवाशांचीही भेट घेतली होती.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीAirportविमानतळBJPभाजपा