शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

गेल्या ४ वर्षांत १७० आमदारांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपचा आकडा किती? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 10:41 IST

विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता कोणत्या पक्षातून किती आमदारांनी दलबदल केला, याची माहिती देणारा एक अहवाल समोर आला आहे.

ठळक मुद्देADR च्या अहवालात महत्त्वाची माहिती समोरगेल्या ४ वर्षांत काँग्रेसच्या १७० आमदारांचा पक्षाला रामरामकाही राज्यांमध्ये दलबदलूंमुळे सत्तातर

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आणि अन्य पक्षांनी आपापली ताकद पणाला लावली आहे. अशातच कोणत्या पक्षातून किती आमदारांनी दलबदल केला, याची माहिती देणारा एक अहवाल समोर आला आहे. यामुळे कोणत्या पक्षाचा फायदा आणि कोणाचे अधिक नुकसान झाले, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. (assembly election 2021 adr report says 170 mla of congress left the party in last four years) 

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADR या संस्थेकडून यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भाजपचे सरकार आल्यानंतर काँग्रेसला मोठी गळती लागल्याचे चित्र संपूर्ण देशाने पाहिले. गेल्या चार वर्षांत विविध राज्यांमधील निवडणुकीवेळी काँग्रेसच्या शेकडो आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे या ADR रिपोर्टमधून समोर आले आहे. 

ना प्रायव्हेट जॉब, ना बिझनेस... बेरोजगारीच्या संकटात तरुणांना हवीय सरकारी नोकरी 

काँग्रेसला मोठी गळती

सन २०१६ ते २०२० या चार वर्षाच्या काळात विविध राज्यांमधील तब्बल १७० आमदारांनी काँग्रेसला रामराम करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. तर भाजपच्या केवळ १८ आमदारांनी पक्ष सोडल्याची माहिती समोर आली आहे. याच कालावधीत आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या ४०५ आमदारांपैकी १८२ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, २८ आमदार काँग्रेसमध्ये गेले तर २५ आमदार तेलंगण राष्ट्र समितीत गेले, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

दलबदलमुळे सत्तांतर

विशेष म्हणजे गोवा, मध्य प्रदेश, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आमदारांनी अन्य पक्षात प्रवेश केल्यामुळे  तेथील सरकार बदलले. यापैकी गोवा, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील सत्ता बदलाची चर्चा देशभर सुरू होती. या रिपोर्टनुसार, सदर कालावधीत पक्ष बदलून राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या १६ खासदारांपैकी १० खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आला आहे. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या केवळ पाच खासदारांनी फारकत घेत अन्य पक्षात प्रवेश केला. काँग्रेसच्या सात राज्यसभा सदस्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, अशी माहिती या रिपोर्टमधून समोर आली आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार खालसा करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, नेते, मंत्री, आमदार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक