शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

गेल्या ४ वर्षांत १७० आमदारांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपचा आकडा किती? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 10:41 IST

विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता कोणत्या पक्षातून किती आमदारांनी दलबदल केला, याची माहिती देणारा एक अहवाल समोर आला आहे.

ठळक मुद्देADR च्या अहवालात महत्त्वाची माहिती समोरगेल्या ४ वर्षांत काँग्रेसच्या १७० आमदारांचा पक्षाला रामरामकाही राज्यांमध्ये दलबदलूंमुळे सत्तातर

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आणि अन्य पक्षांनी आपापली ताकद पणाला लावली आहे. अशातच कोणत्या पक्षातून किती आमदारांनी दलबदल केला, याची माहिती देणारा एक अहवाल समोर आला आहे. यामुळे कोणत्या पक्षाचा फायदा आणि कोणाचे अधिक नुकसान झाले, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. (assembly election 2021 adr report says 170 mla of congress left the party in last four years) 

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADR या संस्थेकडून यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भाजपचे सरकार आल्यानंतर काँग्रेसला मोठी गळती लागल्याचे चित्र संपूर्ण देशाने पाहिले. गेल्या चार वर्षांत विविध राज्यांमधील निवडणुकीवेळी काँग्रेसच्या शेकडो आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे या ADR रिपोर्टमधून समोर आले आहे. 

ना प्रायव्हेट जॉब, ना बिझनेस... बेरोजगारीच्या संकटात तरुणांना हवीय सरकारी नोकरी 

काँग्रेसला मोठी गळती

सन २०१६ ते २०२० या चार वर्षाच्या काळात विविध राज्यांमधील तब्बल १७० आमदारांनी काँग्रेसला रामराम करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. तर भाजपच्या केवळ १८ आमदारांनी पक्ष सोडल्याची माहिती समोर आली आहे. याच कालावधीत आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या ४०५ आमदारांपैकी १८२ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, २८ आमदार काँग्रेसमध्ये गेले तर २५ आमदार तेलंगण राष्ट्र समितीत गेले, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

दलबदलमुळे सत्तांतर

विशेष म्हणजे गोवा, मध्य प्रदेश, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आमदारांनी अन्य पक्षात प्रवेश केल्यामुळे  तेथील सरकार बदलले. यापैकी गोवा, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील सत्ता बदलाची चर्चा देशभर सुरू होती. या रिपोर्टनुसार, सदर कालावधीत पक्ष बदलून राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या १६ खासदारांपैकी १० खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आला आहे. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या केवळ पाच खासदारांनी फारकत घेत अन्य पक्षात प्रवेश केला. काँग्रेसच्या सात राज्यसभा सदस्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, अशी माहिती या रिपोर्टमधून समोर आली आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार खालसा करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, नेते, मंत्री, आमदार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक