शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गेल्या ४ वर्षांत १७० आमदारांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपचा आकडा किती? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 10:41 IST

विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता कोणत्या पक्षातून किती आमदारांनी दलबदल केला, याची माहिती देणारा एक अहवाल समोर आला आहे.

ठळक मुद्देADR च्या अहवालात महत्त्वाची माहिती समोरगेल्या ४ वर्षांत काँग्रेसच्या १७० आमदारांचा पक्षाला रामरामकाही राज्यांमध्ये दलबदलूंमुळे सत्तातर

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आणि अन्य पक्षांनी आपापली ताकद पणाला लावली आहे. अशातच कोणत्या पक्षातून किती आमदारांनी दलबदल केला, याची माहिती देणारा एक अहवाल समोर आला आहे. यामुळे कोणत्या पक्षाचा फायदा आणि कोणाचे अधिक नुकसान झाले, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. (assembly election 2021 adr report says 170 mla of congress left the party in last four years) 

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADR या संस्थेकडून यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भाजपचे सरकार आल्यानंतर काँग्रेसला मोठी गळती लागल्याचे चित्र संपूर्ण देशाने पाहिले. गेल्या चार वर्षांत विविध राज्यांमधील निवडणुकीवेळी काँग्रेसच्या शेकडो आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे या ADR रिपोर्टमधून समोर आले आहे. 

ना प्रायव्हेट जॉब, ना बिझनेस... बेरोजगारीच्या संकटात तरुणांना हवीय सरकारी नोकरी 

काँग्रेसला मोठी गळती

सन २०१६ ते २०२० या चार वर्षाच्या काळात विविध राज्यांमधील तब्बल १७० आमदारांनी काँग्रेसला रामराम करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. तर भाजपच्या केवळ १८ आमदारांनी पक्ष सोडल्याची माहिती समोर आली आहे. याच कालावधीत आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या ४०५ आमदारांपैकी १८२ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, २८ आमदार काँग्रेसमध्ये गेले तर २५ आमदार तेलंगण राष्ट्र समितीत गेले, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

दलबदलमुळे सत्तांतर

विशेष म्हणजे गोवा, मध्य प्रदेश, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आमदारांनी अन्य पक्षात प्रवेश केल्यामुळे  तेथील सरकार बदलले. यापैकी गोवा, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील सत्ता बदलाची चर्चा देशभर सुरू होती. या रिपोर्टनुसार, सदर कालावधीत पक्ष बदलून राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या १६ खासदारांपैकी १० खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आला आहे. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या केवळ पाच खासदारांनी फारकत घेत अन्य पक्षात प्रवेश केला. काँग्रेसच्या सात राज्यसभा सदस्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, अशी माहिती या रिपोर्टमधून समोर आली आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार खालसा करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, नेते, मंत्री, आमदार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक