शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

अमिताभ संपविणार रेल्वे अनारक्षित तिकिटांच्या रांगा, तिकीट खरेदीसाठी अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 3:56 AM

अमिताभ बच्चन यांचा ‘कालिया’हा गाजलेला चित्रपट आहे. यात बिग बींचा एक सदाबहार डायलॉग आहे. ‘हम जहा खडे होते है,वहीसे लाईन शुरु होती है’. लवकरच रेल्वेत सुद्धा हा डायलॉग ऐकायला मिळणार

- संतोष ठाकूरनवी दिल्ली - अमिताभ बच्चन यांचा ‘कालिया’हा गाजलेला चित्रपट आहे. यात बिग बींचा एक सदाबहार डायलॉग आहे. ‘हम जहा खडे होते है,वहीसे लाईन शुरु होती है’. लवकरच रेल्वेत सुद्धा हा डायलॉग ऐकायला मिळणार असून लोकांना बच्चनप्रमाणेच रांगेत उभे न राहता अनारक्षित-यूटीएस तिकीट खरेदीचे आवाहन करण्यात येईल.रेल्वे स्थानकांवरील अनारक्षित तिकिटांसाठीच्या रांगा संपविण्यासाठी रेल्वेकडून अशाप्रकारचे इतरही काही संवाद आणि व्हिडिओ जारी केले जाणार आहेत. रेल्वेने यूटीएस अथवा अनारक्षित तिकीट देशभरात अ‍ॅपच्या माध्यमाने देणे सुरू केले आहे. आणि नोव्हेंबरपासून इंटरझोन अनारक्षित तिकीट अ‍ॅपद्वारे उपलब्ध करून देणे सुरू केल्यापासून दर दिवसाला जवळपास ८० हजार तिकिटांची विक्री अ‍ॅपद्वारे होते आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत सुमारे दीड लाखावर तिकिटे यूटीएस अ‍ॅपने विकल्या जातील,अशी अपेक्षा आहे. यामुळे स्थानकांवर तिकीट खिडक्यांपुढील रांगा कमी करण्यास निश्चितच मदत मिळेल.रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या आदेशानुसार लोकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या या अ‍ॅपवर प्रारंभी केवळ एका झोनमध्येच प्रवासाचे तिकीट दिले जात होते. परंतु १ नोव्हेंबरपासून यावर इंटरझोन अनारक्षित तिकीटही मिळत आहे. कोणत्याही रेल्वे स्टेशनच्या पाच किमी अंतरापर्यंत या अ‍ॅपवर तिकीट खरेदी केले जाऊ शकते. ग्रामीण, शहर,गाव,खेड्याच्या प्रत्येक स्टेशनवर ते कार्यरत आहे.अमिताभ आणि इतर सिनेकलावंत, नामांकित लोक संदेशाद्वारे यूटीएसचा लाभ सांगतील तेव्हा लोक तासन्तास रांगेत उभे राहण्याऐवजी आपल्या मोबाईलवर अ‍ॅपच्या माध्यमाने अनारक्षित तिकीट खरेदीस प्राधान्य देतील,अशी आशा रेल्वेला आहे. यासोबतच लोकांना एका क्लिकवर तिकीट देण्याचे गोयल यांचे उद्दिष्टही साध्य होईल. लोक अ‍ॅपवर तिकीट खरेदी करून थेट गाडीत बसू शकतील.सर्वाधिक खरेदी मुंबईतएका अधिकाऱ्याने सांगितले की, अ‍ॅपवरील तिकिटाचे प्रिंटही काढण्याची सुविधा आहे. प्रवास केला नाहीतर हे तिकीट रद्दही केले जाऊ शकते. संपूर्ण किराया प्रवाशांच्या अकाऊंटमध्ये परत जाईल. मुंबईस्थित मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे क्षेत्रात अ‍ॅपद्वारे तिकीट खरेदी करणाºयांच्या सर्वाधिक संख्या आहे. तिसºया आणि चौथ्या क्रमांकावर कोलकात्यातील ईस्टर्न रेल्वे आणि चेन्नईचे दक्षिण रेल्वे आहे. तर साऊथ सेंट्रल रेल्वे पाचव्या क्रमांकावर आहे. या अ‍ॅपद्वारे दररोज ८० हजार तिकिटे विकल्या जात असून याद्वारे रेल्वेला ४५ लाख रुपयांवर उत्पन्न मिळत आहे. जवळपास साडेचार लाख प्रवासी या तिकिटांवर प्रवास करीत आहेत.

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनIndian Railwayभारतीय रेल्वे