शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अखिलेश यादव यांनी मानले मतदार, मायावतींचे आभार; योगी, मौर्य यांच्यावर केला प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 22:01 IST

अखिलेश यादव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मतदार आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचे आभार मानले आहेत.

लखनौ - गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयामुळे समाजवादी पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बसपासोबत निवडणूकपूर्व तडजोड करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन विजयाची पायाभरणी करणारे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा या विजयामुळे आत्मविश्वास दुणावला आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मतदार आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचे आभार मानले आहेत. तसेच या निकालांमधून मतदारांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्याविरोधातील रोष व्यक्त केल्याचा टोला लगावला आहे.  

 

 ईशान्येतील तीन राज्यांमधील ऐतिहासिक विजयानंतर भाजपाला नव्याने चढलेली विजयाची धुंदी बुधवारी उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांच्या निकालामुळे पुरती उतरली. कारण उत्तर प्रदेशच्या गोरखपूर, फुलपूर आणि बिहारच्या अररिया लोकसभा पोटनिवडणुकांचे निकाल आता जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. मायावतींच्या बसपाचे पाठबळ लाभलेल्या समाजवादी पक्षाने दोन्ही मतदारसंघात भाजपाला पराभवाची चव चाखायला भाग पाडले आहे. तिनही ठिकाणी भारतीय जनता पक्ष पराभवाच्या छायेत आहे. विशेषतः गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघातला पराभव भाजपासाठी धक्कादायक आहे. या दोन्ही मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असल्याने ही पोटनिवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची होती. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघात भाजपाने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. 

निकाल -

- गोरखपुरमध्ये समाजवादी पार्टीच्या प्रवीण निषाद यांनी भाजपाच्या उपेंद्र पटेल यांचा 21 हजार 881 मतांनी पराभव केलाय. येथे भाजपाला 434632 मतं तर सपाला 456513 मतं मिळाली.

- फुलपूरच्या जागेवर सपा उमेदवार नागेंद्र पटेल यांनी भाजपाच्या कौशलेंद्र पटेल यांना 59 हजार 613 मतांनी धूळ चारली.  

- बिहारच्या अररिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा विजय मिळवत भाजपाचा 61 हजार 788 मतांनी  पराभव केला. येथे राजदच्या  सरफराज आलम यांनी भाजपाच्या प्रदीप सिंह यांना पराभूत केले.  

- याशिवाय बिहारमध्ये दोन जागांवर विधानसभा पोटनिवडणूक झाली.  जहानाबाद येथेही भाजाला दणका देत राजदने विजय मिळवलाय, केवळ भभुआ येथे भाजपाच्या रिंकी पांडे या विजयी ठरल्या आहेत. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी