शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

"जिना यांच्यानंतर ओवेसी देशाची दुसरी फाळणी करतील", गिरीराज सिंह यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 14:56 IST

गिरीराज सिंह हे असदुद्दीन ओवेसी यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करताना दिसून येतात.

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोहम्मद अली जिना यांच्याप्रमाणेच असदुद्दीन ओवेसीही भारताची दुसरी फाळणी करतील, असं विधान गिरिराज सिंह यांनी केले आहे. तसेच, असदुद्दीन ओवेसी कायद्याच्या विरोधात बोलतात आणि प्रक्षोभक वक्तव्य करतात असा आरोप गिरीराज सिंह यांनी केला आहे.

गिरीराज सिंह हे असदुद्दीन ओवेसी यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करताना दिसून येतात. शुक्रवारी गिरिराज सिंह म्हणाले की, ओवेसी कायद्याच्या विरोधात बोलतात आणि प्रक्षोभक वक्तव्य करतात. जिना यांच्यानंतर ओवेसी भारताच्या दुसऱ्या फाळणीचे नेतृत्व करतील. भारताच्या फाळणीनंतर अनेक लोक पाकिस्तान आणि बांगलादेशात राहिले. या दोन्ही देशांमध्ये त्यांच्यासोबत अनेक घटना घडल्या, पण ओवेसी यांनी या गोष्टीचा कधी निषेध केला नाही. पाकिस्तान किंवा बांगलादेश असता तर ओवेसींचा आवाज आतापर्यंत दाबला गेला असता, असे गिरीराज सिंह म्हणाले.

एनआरसी (NRC) मुद्द्यावरून गिरीराज सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. जेव्हा आपण एनआरसीबद्दल बोलतो तेव्हा राहुल गांधी विरोध करतात. मात्र, हिमाचलमधील काँग्रेस सरकार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभागृहात काँग्रेसचे मंत्री म्हणत आहेत की, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि लोकांना त्याचे सर्टिफिकेट दिले पाहिजे, म्हणजेच एनआरसी असायला हवे. तसेच, एनआरसी फक्त बिहारमधील ४ जिल्ह्यांनाच नाही तर संपूर्ण बिहार आणि देशात आवश्यक आहे. एनआरसी लागू केले नाही, तर भारतीयांचा नाश होईल, असेही गिरीराज सिंह यांनी सांगितले.

याचबरोबर, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, काँग्रेस सरकारने आपल्या राजवटीत वक्फ बोर्डाला कोणतीही जमीन बळकावण्याचा अधिकार दिला होता. याचे पुरावे हिमाचल प्रदेशचे मंत्री विधानसभेत देत आहेत. तसेच, वक्फ बोर्डाची मालमत्ता कशी वाढत आहे? असा सवाल करत रेल्वे विभागाचे अनेक प्रकल्प रोखण्यात आले, कारण वक्फ बोर्डाने ही आपली मालमत्ता असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाची गुंडगिरी थांबली पाहिजे, असेही गिरीराज सिंह म्हणाले.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपा