शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

बोडो हत्याकांडाचा निषेध करणा-या आदिवासी- पोलिसांत चकमक, ५ ठार

By admin | Updated: December 24, 2014 15:09 IST

सोनितपूर आणि कोक्राझार जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करणा-या स्थानिक आदिवासी व पोलिसांदरम्यान झालेल्या चकमकीत ५ आदिवासी ठार झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत

गुवाहाटी, दि. २४ - सोनितपूर आणि कोक्राझार जिल्ह्यात अतिरेक्यांनी हल्ला करून ६० हून अधिक नागरिकांना निर्घृणपणे ठार मारल्यामुळे स्थानिक आदिवासी संतप्त झाले आहेत. या हल्ल्याचा निषेध करणारे आदिवासी व पोलिसांत चकमक झाली, ज्यात पाच आदिवासी ठार झाले. पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले आहेत. पोलिस व आदिवासींमधील धुमश्चक्री अद्याप कायम आहे. 
मंगळवारी संध्याकाळी एनडीएफबीच्या अतिरेक्यांनी बेछुट गोळीबार करत निष्पाप नागरिकांचे प्राण घेतले. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आदिवासींनी आंदोलन करत सोनितपूर जिल्ह्यातील फुलगौरी भागातील बोडो नागरिकांवर चालून जात त्यांची घेर जाळली. सशस्त्र पोलिसांनी संतप्त आदिवासींना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. शेवटी पोलिसांना गोळीबार करावा लागला ज्यात पाच आदिवासी मृत्यूमुखी पडले आणि परिस्थिती आणखीनच चिघळली.
दरम्यान सोनितपूर आणि कोक्राझार जिल्ह्यात चार ठिकाणी एनडीएफबीच्या अतिरेक्यांनी मंगळवारी संध्याकाळी उच्छाद मांडला, त्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेतील ६० हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. काल संध्याकाळी अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार करत निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले.
 
एनडीएफबीच्या अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार करीत एकट्या सोनितपूरमध्ये ३० जणांना ठार केले. त्यात विश्वनाथ चारीयाली व धेकियाजुली येथील अनेक नागरिकांचा समावेश आहे. तर कोक्राझारमध्ये चार आदिवासी मारले गेले. हल्ला झाला ते स्थळ आसाम आणि अरुणाचल च्या सीमेजवळ आहे. कोक्राझारच्या उल्टापानी या भागात नक्षलवाद्यांनी सहा ग्रेनेडचा स्फोट घडवला. 
दरम्यान आसाममधील माओवाद्यांचे कृत्य दहशतवाद्यांसारखे, त्यांना दहशतवादी म्हणूनच हाताळायला हवे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.  आसाममध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची तुकडी पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.