शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

बांगलादेशला जाणारे कांद्याचे राेजचे ८० ट्रक जागेवर थांबले, विमाने रद्द, सीमेजवळ जाणे टाळण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 11:40 IST

बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करीत असल्याने या घडामोडीने दोन्ही देशांचे नुकसान होणार

अराजकतेनंतर या देशासह भारताने आपल्या सीमा सील केल्या असून, बांगलादेशमध्ये भारताकडून हाेत असलेली शेतमालाची आयातही थांबली आहे. बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करीत असल्याने या घडामोडीने दोन्ही देशांचे नुकसान होणार आहे. 

नाशिकमधून दररोज ६० ते ७० ट्रक कांदा दरराेज बांगलादेशला ट्रकद्वारे रवाना हाेतो. एका ट्रकमध्ये तीस टन कांदा भरला जातो. मात्र, कांद्याची वाहतूक थांबली असल्याचे कांदा निर्यातदारांनी सांगितले. मागील आठवड्यात बांगलादेशकडे रवाना झालेले कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर अडकून पडले आहेत. हा कांदा कमी भावात कोलकात्यातच विकण्याची आफत ओढवू शकते.  नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष अन् कांद्याची मोठ्या प्रमाणात बांगलादेशात निर्यात केली जाते.

बिहारमध्ये अलर्ट जारीबिहारच्या अनेक भागांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय निमलष्करी दलांसह पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याची सीमा नेपाळशी आहे, ज्याचा वापर इतर देशांतील घुसखोर भारतात प्रवेश करण्यासाठी करतात, असे पोलिसांनी सांगितले.

सीमेजवळ जाणे टाळा...सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बांगला देशातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ४,०९६ किमी लांबीच्या भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर राहणाऱ्या लोकांना सीमावर्ती भागात, विशेषत: रात्रीच्या वेळी अनावश्यक जाऊ नका, असे आवाहन केले आहे.

विमाने रद्दएअर इंडिया, इंडिगोसह भारतातील काही प्रमुख कंपन्यांनी बांगलादेशासाठीची विमानसेवा तातडीने स्थगित केली आहे. प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाची असून, विमानसेवा स्थगित केल्याचे विमान कंपन्यांनी सांगितले.

भारताच्या वस्त्रोद्योगावर परिणामबांगलादेशातील राजकीय संकट भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी चिंतेचा विषय झाला आहे. येथील कोणत्याही पुरवठ्यात व्यत्यय आल्यास त्याचा पुरवठा साखळीवर तत्काळ परिणाम होईल, त्यामुळे भारतीय कंपन्यांच्या उत्पादनावर आणि पुरवठ्यावर परिणाम होईल, असे भारतीय कापड उद्योग परिसंघाने (सिटी) म्हटले आहे. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेशagitationआंदोलनonionकांदा