शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
3
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
4
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
5
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
6
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
7
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
8
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
9
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
10
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
11
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
12
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
13
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
14
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
15
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
16
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
17
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
18
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
19
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!
20
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार

एएन-32 अपघात : शहिदांचे पार्थिव शोधण्यास गेलेली रेस्क्यू टीमच संकटात; 9 दिवसांपासून अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 4:04 PM

साप, विंचूंसारख्या विषारी प्राण्यांसोबतच त्यांच्याकडे आवश्यक अन्न, पाणीही नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

ईटानगर : गेल्या महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालेल्या हवाईदलाचे एएन-32 विमानतील शहिदांना आणण्यासाठी गेलेली रेस्क्यू टीमच खराब हवामानामुळे गेल्या 9 दिवसांपासून अडकली आहे. साप, विंचूंसारख्या विषारी प्राण्यांसोबतच त्यांच्याकडे आवश्यक अन्न, पाणीही नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. खराब हवामानामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचताही येत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. स्थिती सुधारल्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे एअरलिफ्ट करण्यात येईल. 

हवाई दलाचे मालवाहू विमान 3 जूनपासून गायब होते. अरुणाचलमध्ये हे विमान बेपत्ता झाले होते. यामध्ये हवाई दलाच्या 8 क्रू मेंबरसोबत 13 जण प्रवास करत होते. या विमानाच्या शोधासाठी सुखोई 30, सी 130 सुपर हर्क्युलस, पी8आय एअरक्राफ्ट, ड्रोन आणि सॅटेलाईटचा वापर करत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याशिवाय नौदल, सैन्य, गुप्तहेर संघटना, आयटीबीपी आणि पोलिसांचे जवानही शोध घेत होते. आठ दिवस ही शोधमोहिम राबविण्यात आली होती. या दरम्यान, एमआय-17 हेलिकॉप्टरला या विमानाचे अवशेष जंगलात दिसून आले होते. 

यानंतर 12 जूनला सियांग जिल्ह्यातील जंगलामध्ये दोन हेलिकॉप्टरद्वारे 12 जणांच्या रेस्क्यू टीमला उतरविण्यात आले होते. 19 जूनला या डोंगररांगांमधून 6 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तर 20 जूनला 7 जणांचे मृतदेह मिळाले होते. 

हवेचा प्रवाह मोठा असल्याने या भागात विमान किंवा हेलिकॉप्टर उडविणे कठीण बनते. यामुळे या ठिकाणी पोहोचणे हवाई दलाला शक्य झालेले नाही. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास या जवानांनाही प्राणाला मुकावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलAccidentअपघात