शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

20 विद्यार्थ्यांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू

By admin | Updated: July 25, 2014 08:55 IST

तेलंगणमधील एका मानवरहित रेल्वेफाटकावर पॅसेंजरची स्कूलबसला धडक बसून २० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले.

हैदराबाद : तेलंगणच्या मेडक जिल्ह्याच्या मासायिपेट गावात एका मानवरहित रेल्वेफाटकावर नांदेड-सिकंदराबाद पॅसेंजरने गुरुवारी स्कूलबसला धडक दिली. या अपघातात २० विद्यार्थी व स्कूलबसचा चालक असे एकूण २१ जण ठार झाले. जखमी विद्याथ्र्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आह़े
तूपरस्थित एका खासगी शाळेचे ५ ते १५ वर्षे वयोगटातील सुमारे 4० विद्यार्थी स्कूलबसमध्ये होत़े नेहमीचा चालक सुटीवर असल्याने नवा चालक स्कूलबस चालवत होता़ शॉर्टकटच्या नादात त्याने मानवरहित रेल्वेक्रॉसिंगवरून जाण्याचा निर्णय घेतला व या निर्णयानेच घात केला़ अपघातानंतर स्कूलबस सुमारे २०० मीटर फरफटत गेली. तिचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता़ सर्वत्र विखुरलेल्या मुलांच्या स्कूलबॅगा, वॉटरबॅगा, जेवणाचे डबे, पुस्तके आणि पालकांचा आक्रोश असे मन हेलावणारे दृश्य या ठिकाणी होत़े या धडकेने रेल्वेचे कोणतेही नुकसान झाले नाही अथवा त्यातील प्रवाशांनाही इजा झाली नाही. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री सदानंद गौडा आणि राज्याचे मुख्यमंत्री क़ेचंद्रशेखर राव यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आह़े (वृत्तसंस्था)
 
गौडा यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख व किरकोळ जखमींना प्रत्येकी 2क् हजार रुपयांची मदत जाहीर केली आह़े 
 
असा झाला अपघात
मासायिपेट व वादियाराम रेल्वे स्थानकांदरम्यान आज गुरुवारी सकाळी ९.१० वाजता हा अपघात झाला़
मासायिपेट मानवरहित रेल्वेक्रॉसिंगवर पार 
करीत असताना नांदेड-सिकंदराबाद पॅसेंजरने या स्कूलबसला धडक दिली़
या धडकेत ८मुले आणि ६ मुली अशी १४ शाळकरी मुले तसेच बसचालक आणि क्लीनर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला; तर २० अन्य मुले जखमी झाली आहेत.