शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
6
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
7
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
8
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
9
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
10
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
11
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
12
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
13
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
14
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
15
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
16
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
17
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
20
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनासारख्या संकटाशी लढण्याचा 'मास्टरप्लान' भारतानं १२ वर्षांपूर्वीच केला होता तयार; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 16:14 IST

CoronaVirus: एनडीआरएफमध्ये काम केलेल्या अधिकाऱ्यांनी तयार केला होता आराखडा

नवी दिल्ली: सध्या देशात कोरोनानं थैमान घातलं असून दिवसागणिक कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यानं आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. मात्र अशा प्रकारच्या संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेला मास्टरप्लान भारतानं २००८ सालीच तयार केला होता. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा त्याची अंमलबजावणीच झाली नाही. अन्यथा आज देशात वेगळं चित्र दिसलं असतं. विषाणूंमुळे पसरणारे आजारे, त्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती यांचा सामना करण्यासाठी एक आराखडा तयार केला गेला होता. न्यूज१८ या इंग्रजी वृत्तसंकेतस्थळानं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

विषाणूंमुळे पसरणाऱ्या आजारांचा संसर्ग रोखण्यात सोशल डिस्टन्सिंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे विषाणूंच्या माध्यमातून येणारा आजार पसरल्यास नेमकं काय काय करायला हवं, याची अतिशय विस्तृत माहिती आराखड्यात होती. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग, राज्य पातळीवरील औषधांचा पुरवठा, आवश्यक उपकरणं, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लागणारे विशिष्ट पोशाख, रुग्णालयांमधील सज्जता अशा व्यापक मुद्द्यांचा आराखड्यात समावेश होता. 

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा आराखडा तयार करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. लष्कराच्या डायरेक्टर जनरल पदावर काम केलेल्या जे. आर. भारद्वाज यांच्या अध्यक्षतेखाली आराखडा तयार करण्यात आला होता. १९९९ च्या कारगिल युद्धात वैद्यकीय मदत पोहोचवण्यात भारद्वाज यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या कौशल्याचं खूप कौतुकदेखील झालं होतं. त्यामुळेच त्यांच्यावर ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

सध्या मोदी सरकार कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना संसाधनांची कमतरता भासत आहे. एनडीआरएफनं १२ वर्षांपूर्वी तयार केलेल्या आराखड्याची अंमलबजावणी झाली असती, तर आज वेगळं चित्र दिसलं असतं, असं मत आराखडा निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. आराखड्यात सुचवण्यात आलेल्या शिफारशींवर काम झालं असतं, तर आता सरकारकडे उपलब्ध संसाधनांची इत्यंभूत माहिती, आवश्यक उपकरणं, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग तयार असला असता, असंदेखील या अधिकाऱ्यांनी म्हटलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या