शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

वारकरी मंडळाचा ‘गाव तेथे वारकरी फलक’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:02 IST

भविष्यात सेवाव्रती कीर्तनकार तयार व्हावेत, उत्कृष्ट गायक-वादक वारकरी घडावेत, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्त तरुणपिढी घडावी, या तरुण पिढीकडून कुटुंबव्यवस्था टिकावी आणि देशप्रेम जागृत व्हावे, या उद्देशाने अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने ‘गाव तेथे वारकरी फलक’ हा संकल्प सोडण्यात आला आहे. या संकल्पनेची सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून करण्यात आली आहे.

सातपूर : भविष्यात सेवाव्रती कीर्तनकार तयार व्हावेत, उत्कृष्ट गायक-वादक वारकरी घडावेत, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्त तरुणपिढी घडावी, या तरुण पिढीकडून कुटुंबव्यवस्था टिकावी आणि देशप्रेम जागृत व्हावे, या उद्देशाने अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने ‘गाव तेथे वारकरी फलक’ हा संकल्प सोडण्यात आला आहे. या संकल्पनेची सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून करण्यात आली आहे.  ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे अण्णासाहेब महाराज अहेर (हिसवळकर) यांच्या कल्पनेतून हा उपक्रम आकार घेत आहे. ‘गाव तेथे वारकरी फलक’ या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर, येवला, चांदवड, मालेगाव, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, कळवण, देवळा, सुरगाणा या तालुक्यांसह शहरातील नाशिकरोड, सिडको, सातपूर, पंचवटी, मध्य नाशिक आदी ठिकाणी वारकरी फलकाचे अनावरण करण्यात आले आहे. जवळपास जिल्ह्यातील ८० गावांमध्ये फलकाचे अनावरण झाले आहे. ही संकल्पना अन्य जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे.विस्कटलेला वारकरी समाज एकसंघ व्हावा याकरिता त्यांनी वारकरी मेळावे, बैठका, हितगूज सभा घेऊन त्यांच्यामध्ये स्नेह वाढविला. प्रकाश महाराज बोधले यांचे संकल्पनेतून महाराष्ट्रभर सुरू झालेला ‘गाव तेथे वारकरी फलक’ या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्याचे काम अहेर महाराज करीत आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘गाव तेथे वारकरी’ उपक्रम यशस्वी होत आहे. या माध्यमातून वारकरी भाविकांच्या समस्या व विचार जाणून घेतल्या जात आहे. जिल्हा परिषद कर्मचारी बाळासाहेब साबळे यांच्या सहकार्यातून आकाशवाणी व ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ या कार्यक्रमात दूरदर्शनवर अहेर महाराज यांची कीर्तन सेवा गाजलेली आहे. लहानपणी आळंदी येथे जयराम महाराज भोसले यांच्या मार्गदर्शन व सहवासातून संस्कार झाले. वै.जगन्नाथ महाराज पवार, एकनाथ महाराज चव्हाण, आचार्य रामकृष्णदास महाराज लहवीतकर, माधव महाराज घुले यांना अहेर महाराज आदर्श मानतात. अण्णासाहेब महाराज अहेर हे कीर्तन प्रवचनाची फी ठरवत नाही, जे मिळाले त्यावर समाधान मानतात. आतापर्यंत त्यांनी हजारो लोकांना व्यसनमुक्त केले आहे. अंधश्रद्धा, कौटुंबिक कलह, वाद मिटविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांनी आजपर्यंत अनेक गांवामध्ये हरिपाठ, भजन, सप्ताह सुरू करून आचार, विचार, प्रचार व प्रसार यातून वारकरी एकत्र करून संघटनवृद्धी व जनजागृती केली आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने नाशिकबाहेर देहू आळंदीबरोबरच दिल्ली येथील रामलीला येथेही हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला आहे.अण्णासाहेब महाराज अहेर यांचे कार्यगेल्या ३८ वर्षांपासून निष्काम भावनेने वारकरी पंथासाठी काम करणारे सेवाव्रती व्यक्तीमत्व असलेले अहेर महाराज यांनी वारकरी पंथाच्या प्रचार व प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांची तळमळ व सेवाभावी परमार्थ पाहून अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले (डिकसळकर) यांनी दि.८ जुलै २०१६ रोजी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. अहेर महाराज यांनी याकरिता संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक