शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

नांदूरशिंगोटेत नळाद्वारे चक्क जिवंत अळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 8:01 PM

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळांना मंगळवारी (दि.१४) जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. नळाद्वारे चक्क जिवंत अळ्या आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळांना मंगळवारी (दि.१४) जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. नळाद्वारे चक्क जिवंत अळ्या आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.नांदूरशिंगोटे गावाला कणकोरीसह पाच गाव नळपाणी पुरवठा योजनेतून दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. सदरची योजना भोजापूर धरणातून राबविण्यात आली असून, चास खिंडीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. दीड वर्षापूर्वी नादुरुस्त असलेले जलशुद्धीकरण केंद्रावर ४० लाख रुपये खर्च करून दुरुस्त करण्यात आले आहे.परंतु काही दिवसातच तेथील यंत्रणा कुचकामी ठरली असून, पाणी शुद्ध करण्याचेही यंत्र बंद असल्याचे समजते. तर नांदूरशिंगोटे गावात एक कोटी सतरा लाख रुपये खर्च करून मुख्यमंत्री पेयजल योजनेतूननवीन पाइपलाइन करण्यात आली आहे.शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामस्थांना जंतुमिश्रित पाणी पिण्याची वेळ आली आहे. याअगोदर पंधरा दिवसांपूर्वीही गावात जंतुमिश्रित पाणी आल्याच्या तक्रारी होत्या. त्यावेळी सरपंच गोपाल शेळके व उपसरपंच रंजना शेळके तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेत जलशुद्धीकरण केंद्र तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर पाणीपुरवठा सुरुळीत झाला होता. पुन्हा मंगळवारी सकाळी गावातील नळांना जंतुमिश्रित पाणी झाल्याने महिलांनी रोष व्यक्त केला आहे.---------------------दुरुस्ती करण्याचे आश्वासनजलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन यंत्रसामग्रीची व पाणीपुरवठ्याची पाहणी केली आहे. तसेच तेथून पुढे गावातील जलकुंभापर्यंत जलवाहिनीची तपासणी करून माहिती घेतली. गावातील नवीन पाइपलाइनमधून जर जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाला असेल तर त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात येईल. दहा दिवसांपूर्वी जलकुंभाची स्वच्छता करण्यात आली आहे. अपवाद वगळता मागील काळातही गावाला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा झालेला आहे. तसेच पुढील काळातही गावात स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सरपंच गोपाल शेळके यांनी सांगितले़गावातील नळांना जंतुमिश्रित पाणी आल्याने ग्रामस्थांनी भ्रमणध्वनी करून व समक्ष पदाधिकाºयांकडे गाºहाणे मांडले आहे. त्यामुळे पाइपलाइन सदोष की जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाला, असा प्रश्न् प्रशासनाने पुढे पडला आहे. गावातील सर्वच भागात नळाद्वारे चक्क अळ्या आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक