शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

गंगापूर धरणातून वाढीव पाणी आरक्षणासाठी नाशिक महापालिकेचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 14:59 IST

उद्या आढावा बैठक : दारणातील आरक्षण वर्ग करण्याची मागणी

ठळक मुद्देगंगापूर धरणातून ४३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा खात्याकडे नोंदविली गेल्या वर्षी गंगापूरमधून ३९०० तर दारणातून ४०० दलघफू पाणी आरक्षणाला मान्यता दिली होती

नाशिक : यंदा वरुणराजाच्या कृपावृष्टीमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या  गंगापूर धरणात ९८ टक्के पाणीसाठा असल्याने महापालिकेने सन २०१७-१८ या वर्षासाठी गंगापूर धरणातून ४३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा खात्याकडे नोंदविलेली आहे. दारणा धरणातील ४०० दलघफू पाणी आरक्षणापैकी सन २०१६-१७ मध्ये महापालिकेने केवळ ३०२ दलघफू पाणी उचलल्याने यंदा ३०० दलघफू पाणी आरक्षणाचीच मागणी करण्यात आलेली आहे. गुरुवारी (दि.२) जिल्हाधिकाऱ्याकडे होणाऱ्या  पाणी आरक्षणाच्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत दारणातील पाणी आरक्षण कमी करुन ते गंगापूर धरणातून वाढवून देण्याचा आग्रह महापालिकेकडून धरला जाणार आहे.महापालिकेने गेल्या वर्षी दि. १५ आॅक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीसाठी गंगापूरमधून ४२०० दलघफू तर दारणातून ३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली होती परंतु, जलसंपदा खात्याने गंगापूरमधून ३९०० तर दारणातून ४०० दलघफू पाणी आरक्षणाला मान्यता दिली होती. महापालिकेने २९० दिवसांत पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करत प्रतिदिन १४.७३ दलघफू पाणी उचल लक्षात घेता ३१ जुलैपर्यंत गंगापूर धरणातील पाण्याचा पूर्णपणे वापर केला होता. तर दारणा धरणातून ४०० दलघफू पैकी ३०२ दलघफू इतकीच पाण्याची उचल करण्यात आली होती. महापालिका दारणा धरणातून नाशिकरोड भागासाठी पाण्याची उचल करत असते परंतु, दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता दारणा धरणातून ३०० दलघफूच्या वर पाण्याची उचल करता येत नाही. तांत्रिक दृष्टया पाणी उचल करण्यात अडचणी येत असल्याने दारणातील पाणी आरक्षण कमी करण्याची मागणी महापालिकेने यापूर्वी वारंवार जलसंपदा विभागाकडे केलेली आहे. सन २०१५ पर्यंत महापालिकेला दारणा धरणातून ५०० दलघफू पाणी आरक्षण मिळत आले आहे. परंतु, सन २०१५-१६ मध्ये पाणीप्रश्न पेटल्यानंतर जलसंपदा विभागाने दारणातील पाणी आरक्षण १०० दलघफूने घटवत ४०० दलघफू वर आणले होते. मात्र, गेल्या वर्षभरात ३०२ दलघफू पाण्याचीच उचल करणे महापालिकेला शक्य झाले. दारणातील पाणी उचलण्याची क्षमता लक्षात घेऊन महापालिकेने आता सन २०१७-१८ या वर्षासाठी दारणातून ३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली असून त्याऐवजी गंगापूर धरणातून ४३०० दलघफू पाण्याची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यंदा गंगापूर धरणासह समुहात मुबलक पाणीसाठा असल्याने जलसंपदा विभागाकडून महापालिकेची मागणी मान्य केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गंगापूर धरण समुहात ९९ टक्के साठाशहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ३० आॅक्टोबर २०१७ अखेर ५५०० दलघफू म्हणजे ९८ टक्के पाणीसाठा झालेला आहे. गंगापूर धरण समुहातील काश्यपी धरणात १८४१ दलघफू (९९ टक्के), गौतमी गोदावरी १८५६ दलघफू (९९ टक्के) तर आळंदी धरणात ९७० दलघफू (१०० टक्के) पाणीसाठा आहे. गंगापूर धरण समुहात एकूण १०१६७ दलघफू (९९ टक्के) पाणीसाठा आहे तर दारणा धरणात ७१४९ दलघफू म्हणजे शंभर टक्के पाणीसाठा आहे. दारणा धरणातील पाणी उचलण्यास येणाºया मर्यादा लक्षात घेता दारणातील वाढीव पाणी आरक्षणाचा महापालिकेला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे गंगापूरमधूनच पाणी आरक्षण वाढविण्याचा आग्रह महापालिकेकडून धरला जाणार आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी