शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘घुमान’साठी वाढवले रेल्वेचे दोन डबे

By admin | Updated: March 26, 2015 23:52 IST

साहित्य संमेलन : रसिकांच्या प्रवासाच्या नियोजनावर अखेरचा हात

नाशिक : पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिकरोड येथून सुटणाऱ्या रेल्वेचे दोन डबे वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे ही गाडी आता सोळाऐवजी अठरा डब्यांची राहणार आहे. निमंत्रित मान्यवर व खाद्यपदार्थांसाठी स्वतंत्र डब्यात व्यवस्था करण्यात आली आहे. घुमान येथे येत्या ३, ४ व ५ एप्रिल रोजी साहित्य संमेलन होणार आहे. त्यासाठी १ एप्रिल रोजी नाशिकरोड येथून पहाटे ४ वाजता खास रेल्वे सोडली जाणार आहे. शहर परिसरातून सुमारे एक हजार नाशिककर या रेल्वेने घुमानकडे रवाना होणार आहेत. या सर्वांना रात्री ९ वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पाचारण करण्यात आले असून, तेथे त्यांच्यासाठी स्वागतकक्ष उभारण्यात येणार आहे. तेथे त्यांना चहा व संमेलनाचे किट दिले जाणार आहे. त्यात ओळखपत्र, शबनम बॅग, टुथपेस्ट, ब्रश, टोपी, खास पोशाख या बाबींचा समावेश राहणार आहे. याशिवाय प्रत्येकाची बोगी व सीट क्रमांकही सांगितला जाणार आहे. येथे रसिकांच्या विश्रांतीची सोय करण्यात येणार आहे. पहाटे चार वाजता गाडीत बसल्यानंतर प्रत्येकी दहा प्रवाशांमागे एक स्वयंसेवक उपलब्ध राहणार आहे. त्यासाठी पुण्याच्या एका महाविद्यालयाचे साठ विद्यार्थी दाखल होणार आहेत. प्रवासादरम्यान रेल्वेत साहित्यरसिकांसाठी निरनिराळ्या स्पर्धा, प्रश्नमंजूषा घेतल्या जाणार असून, त्यांचे निकाल रेल्वेतच घोषित होणार आहेत. एवढेच नव्हे, तर विजेत्यांना बक्षिसेही रेल्वेतच दिली जाणार आहेत.