कृत्रिम वणव्यात वृक्षसंपदा होरपळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:37 AM2019-05-29T01:37:02+5:302019-05-29T01:37:28+5:30

पश्चिम नाशिक वनविभागाच्या सातपूर वनपरिमंडळाच्या हद्दीत असलेल्या बेळगाव ढगा येथील संतोषा, भागडी या दोन डोंगरांच्या माथ्यावर कृत्रिम वणवा भडकून डोंगरमाथ्यावरील मौलिक भारतीय प्रजातीच्या वृक्षसंपदेसह जैवविविधतेची अपरिमित हानी झाली

 Trees flowered in artificial forest | कृत्रिम वणव्यात वृक्षसंपदा होरपळली

कृत्रिम वणव्यात वृक्षसंपदा होरपळली

Next

नाशिक : पश्चिम नाशिक वनविभागाच्या सातपूर वनपरिमंडळाच्या हद्दीत असलेल्या बेळगाव ढगा येथील संतोषा, भागडी या दोन डोंगरांच्या माथ्यावर कृत्रिम वणवा भडकून डोंगरमाथ्यावरील मौलिक भारतीय प्रजातीच्या वृक्षसंपदेसह जैवविविधतेची अपरिमित हानी झाली. हा वणवा सलग दोन दिवस भडकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डोंगराच्या पाठीमागे अगदी वनक्षेत्राला लागून दगडखाणीत भूसुरुंगाचे स्फोट घडविले जात असल्यामुळे त्याच्या ठिणग्या उडून वणवा भडकण्याचे प्रकार याठिकाणी सर्रासपणे घडत आहे. वनविभागाला अद्याप या प्रकरणी एकही संशयित आढळून आला नसून केवळ तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते हे विशेष!
बेळगाव ढगा ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या पुढाकाराने वृक्षराजी संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे. तीन वर्षांपूर्वी ४० एकर क्षेत्रात संतोषा, भागडी डोंगराच्या पायथ्याशी २७ हजारांहून अधिक रोपांची लागवड लोकसहभागातून करण्यात आली होती. डोंगराच्या एका बाजूला वृक्षराजी वाढवून वनक्षेत्राचे संवर्धन होत असले तरी दुसºया बाजूने सारूळ शिवारात हेच डोंगर दगडखाणीत उत्खनन करून पोखरले जात आहे. विशेष म्हणजे महसूल-वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गावकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बेळगाव ढगा गावातील लोक डोंगराला हिरवाईचा साज चढविण्यासाठी कष्ट उपसत असताना दुसरीकडे या डोंगराची बाजू मात्र पोखरली जात आहे.
त्यामुळे वनविभागाने येथील डोंगराचे व त्याभोवती असलेल्या वनक्षेत्राच्या संवर्धनासाठी कठोर पावले उचलून तातडीने संशयितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. गुरुवारी (दि.३०) महसूल-वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नाशिक दौºयावर असून ३३ कोटी वृक्षलागवडीबाबात ते प्रशासकीय बैठक घेणार आहेत.
त्यांच्या दौºयाच्या तोंडावर कृत्रिम वणवा लागून दहा ते बारा वर्षांपूर्वीची शेकडो झाडे होरपळली होती. तसेच पक्ष्यांची अंडी या भागात असल्यामुळे त्यांनीही आपली जागा सोडली नाही, परिणामी त्यांनाही जीव गमवावा लागला.
जैवविविधतेची अपरिमित हानी
पाच ते दहा वर्षांपूर्वी नैसर्गिकरीत्या डोंगरमाथ्यावर वाढलेली तीवस, करंज, साग, कहांडळ, बेडशिंगे, धामोडा, करवंद, शिवण यांसारखी भारतीय प्रजातीची शेकडो झाडे दोन दिवसात कृत्रिम वणव्यात खाक झाली. जैवविविधतेची होणारी अपरिमित हानी भरून न येणारी असून वनविभाग, जिल्हा प्रशासन व महसूल विभागाने संयुक्तरीत्या कठोर कारवाई करण्याची मागणी आपलं पर्यावरण संस्था, ग्रीन रिव्हॅल्यूएशन, बेळगाव ढगा ग्रामपंचायतीसह नागरिकांनी केली आहे.

Web Title:  Trees flowered in artificial forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.