शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आज कुंभनगरीत ‘महापर्वणी’

By admin | Updated: September 12, 2015 23:08 IST

द्वितीय शाहीस्नान : गोदास्नानासाठी लाखो भाविक नाशिक-त्र्यंबकला दाखल

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री रविवारी (दि. १३) महापर्वकाळ साधण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गोदातटी डेरा टाकला असून, अपार श्रद्धा आणि भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात नाशिक-त्र्यंबक नगरीला महायात्रेचे स्वरूप आले आहे. नाशिकला तपोवनातील साधुग्राममधून सकाळी ६ वाजता आखाडे व खालशांची शाही मिरवणूक निघणार असून, त्यात निर्मोही अनी आखाडा अग्रभागी राहणार आहे. मधोमध दिगंबर अनी आखाडा चालणार असून, सर्वात शेवटी निर्वाणी अनी आखाडा मिरवणुकीत सहभागी होणार आहे. मिरवणुकीत दिगंबर आखाड्याचे ४५०, निर्वाणी आखाड्याचे १७५ तर निर्मोहीचे ७२ खालसे रामकुंडाकडे शाहीस्नानासाठी मार्गक्रमण करतील. रामकुंडावर पहिल्यांदा निर्माेही अनी आखाड्याचे स्नान सकाळी ७ वाजता होणार असून, सुमारे १०.३० वाजेपर्यंत तीनही आखाडे व खालशांमधील साधू-महंतांचे स्नान आटोपल्यानंतर रामकुंड भाविकांना खुला करून दिला जाणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे द्वितीय पर्वणीला कुशावर्त तीर्थावर शाहीस्नानाचा मान श्रीपंचायती निरंजनी आखाड्याचा असून, त्यांच्यासोबतच श्री तपोनिधी पंचायती आनंद आखाडा सहभागी होणार आहे. पहाटे ३.५५ वाजता त्र्यंबकेश्वरी नागा साधूंची शाही मिरवणूक सुरू होईल. पहाटे ४.१५ ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत दहाही आखाडे नियोजित क्रमानुसार स्नान करतील. त्यानंतर कुशावर्तही भाविकांना खुले करून दिले जाणार आहे. पहिल्या पर्वणीला पोलिसांच्या अवाजवी बंदोबस्तामुळे भाविकांच्या संख्येवर झालेला परिणाम, भाविकांना सुमारे १५ ते २० किलोमीटर करावी लागलेली पायपीट, ठिकठिकाणी बॅरिकेडिंगमुळे आपत्कालीन व्यवस्थेलाही आलेले अडथळे हा सारा कटु अनुभव लक्षात घेत जिल्हा व पोलीस प्रशासनाने द्वितीय शाही पर्वणीचे फेरनियोजन केले असून, भाविकांना गोदाघाटाकडे जाण्याचा मार्ग सुकर व्हावा, याकरिता बंदोबस्ताचा विळखा सैल केला आहे. भाविकांसाठी शहरांतर्गत बससेवा तैनात करण्यात आल्याने पायपीट कमी होणार आहे, तर शहरातील काही भागात दुचाकी पार्किंगची व्यवस्था करत नाशिककरांवरीलही निर्बंध कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. रामकुंड आणि कुशावर्त भोवतालच्या कोअर एरियात मात्र बॅरिकेडिंग कायम राहणार असून, साधू-महंतांचे शाहीस्नान होईपर्यंत रामकुंड व कुशावर्त परिसरात भाविकांना मज्जाव करण्यात येणार आहे. महापर्वणीला सुमारे ३० ते ३५ लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठिकठिकाणी निवाराशेड, तसेच दिशादर्शक फलकांचीही व्यवस्था नाशिक महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. शहरातील चौकाचौकांत लावण्यात आलेल्या ध्वनिक्षेपकांवरून भाविकांना मार्गदर्शनपर सूचना केल्या जात आहेत. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे शनिवारीच लाखो भाविकांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर गाठले असून, शहर व परिसरातील हॉटेल्स, लॉजिंग-बोर्डिंग, धर्मशाळा, मंगल कार्यालये भाविकांच्या गर्दीने गजबजलेली आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानकावरही भाविकांचा ओघ सुरूच आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवली आहे.