शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

कळवण तालुक्यातील ‘त्या’ गावांमध्ये अद्याप भय कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 6:03 PM

दळवट, भांडणे, कोसुर्डे, जामले, दरेगाव, आमदर, वडाळा, जिरवाडे, बोरदैवत, शिव भांडणे, लिंगामा, करंभेळ, खिराड, बापखेडा, देवळीवणी आदी गावांमध्ये १९८३ पासून भूकंपाचे धक्के बसत आहे.

ठळक मुद्देभूकंपाचे धक्के : यंत्र बसविण्यासाठी राज्य सरकारला साकडे१९८६, १९९९, २००० व २००१ मध्ये मोठ्या प्रमाणात धक्के

नाशिक : कळवण तालुक्यातील काही गावांना सातत्याने बसणा-या धक्क्यामुळे गावातील हजारो नागरिक अद्यापही दहशतीखाली वावरत असून, सध्या थंडीचे दिवस असूनही भूकंपाच्या भीतीने लोक रात्रीही घराबाहेर झोपू लागले आहेत. शासनाने सतत बसणा-या भूकंपाचे कारण शोधून उपाययोजना करावी तसेच या भागात भूकंपमापन यंत्र बसवावे, अशी मागणी दहा गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जयश्री पवार या दोघांनीही पुढाकार घेऊन शासनाला पत्र दिले आहे. तसेच संबंधित सर्वच गावांमध्ये तातडीच्या ग्रामसभा होऊन त्यात उपरोक्त मागणीचे ठराव करण्यात आले आहेत. दळवट, भांडणे, कोसुर्डे, जामले, दरेगाव, आमदर, वडाळा, जिरवाडे, बोरदैवत, शिव भांडणे, लिंगामा, करंभेळ, खिराड, बापखेडा, देवळीवणी आदी गावांमध्ये १९८३ पासून भूकंपाचे धक्के बसत असून, १९८६, १९९९, २००० व २००१ मध्ये मोठ्या प्रमाणात धक्के बसल्यानंतर प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली होती. परंतु तेव्हढ्यापुरतेच ग्रामस्थांना आश्वासित केले गेले, उलट नागरिकांनी घाबरू नये व भूकंप झाल्यास काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केल्यानंतर पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. गेल्या महिन्यात २ व ३ डिसेंबर रोजी मध्यरात्री पुन्हा धक्के बसल्यामुळे ग्रामस्थ भयभयीत झाले आहेत. कारण दळवट परिसरात चणकापूर, धनोली, भेगू, भांडणे, बोरगाव आदी ठिकाणी लहान मोठी पाण्याचा साठा असलेली धरणे आहेत. पुण्यातील भूकंप तज्ज्ञांनी २००२ मध्ये भविष्यात दळवट परिसर हा भूकंप प्रवण क्षेत्र असल्याचा अनुमान काढला होता. त्यामुळे शासनाने काहीकाळ दळवट भागात भूकंपमापक यंत्र बसविले होते, कालांतराने मात्र ते काढून नेण्यात आले. अजूनही अधूनमधून धक्के बसत असून, त्याची कोणतीही नोंद घेण्याची यंत्रे याठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना अंदाज बांधणे कठीण होते. त्यामुळे शासनाने या ठिकाणी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी नितीन पवार व जयश्री पवार यांनी केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने वेरुळे, कोसुर्डे, भांडणे, करंभेळ, खडकवण, विरशेत, बापखेडा, तताणी, दळवट, लिंगामे, शिंगाशी या गावांनी ग्रामसभा घेऊन या भागात भूकंपमापन यंत्र बसविण्यात यावे, असे ठराव जिल्हा प्रशासनाकडे पाठविले आहेत. प्रशासनानेही ग्रामस्थांच्या भावनेशी सहमती दर्शवित राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पत्र पाठवून उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपNashikनाशिक