शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

दहा वर्षांची ‘मौनी’ भूमिका बनकरांना भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 12:52 AM

नाशिक : शेतकरी व जनतेच्या प्रश्नांवर गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षाचे माजी आमदार म्हणून दिलीप बनकर यांनी घेतलेली सोईस्कर मौनी भूमिकाच त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मारक ठरण्याची चिन्हे असून, शेतकरीहित व जनआंदोलनाच्या घोषणा फोल ठरल्याने मतदारांसमोर मते मागण्यासाठी जाताना बनकरांना या प्रश्नांवर मतदारच जाब विचारण्याच्या मानसिकतेत आहेत.

ठळक मुद्देशेतकरीहित वाऱ्यावर : जनआंदोलनाच्या वेळी कुठे गेले होते, असा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी व जनतेच्या प्रश्नांवर गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षाचे माजी आमदार म्हणून दिलीप बनकर यांनी घेतलेली सोईस्कर मौनी भूमिकाच त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मारक ठरण्याची चिन्हे असून, शेतकरीहित व जनआंदोलनाच्या घोषणा फोल ठरल्याने मतदारांसमोर मते मागण्यासाठी जाताना बनकरांना या प्रश्नांवर मतदारच जाब विचारण्याच्या मानसिकतेत आहेत.विधानसभा निवडणुकीत आजी- माजी आमदारांनी जनसामान्यांच्या प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेचा विचार करून मतदार गेल्या काही वर्षांतील हिशेब मतदानातून चुकता करतात. त्यामुळे यंदा निफाड विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून दिलीप बनकरांनी गेल्या दहा वर्षांत जनसामान्यांच्या प्रश्नावर घेतलेल्या सोईस्कर भूमिकांना उजाळा देण्यात येत आहे. मतदारसंघातील गावोगावच्या प्रश्नांवर बनकर यांनी साधलेल्या सोईस्कर मौनाचीदेखील चर्चा होऊ लागली आहे.विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यात बनकर पूर्णत: अपयशी ठरले असून, ज्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व ते करू इच्छितात त्या शेतकºयांच्या प्रश्नावरदेखील त्यांची भूमिका सोयीची ठरली आहे. कांदा व द्राक्ष उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाºया निफाड तालुक्यातील शेतकºयांचे कंबरडे मोडण्याचा निर्णय अनेकवार सत्ताधाºयांनी घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी अन्य स्वाभिमानी शेतकरी संघटनांसारख्यांनी आंदोलने केली; पण त्याकडे डोळेझाक केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याच पक्षातर्फे मतदारसंघातील लासलगाव, विंचूरलाच काय पिंपळगावनजीक, चांदवडला केल्या गेलेल्या आंदोलनांकडेही बनकर फिरकले नव्हते, असे पक्षाचे कार्यकर्तेच बोलून दाखवित आहेत. त्यामुळे निवडणूक आल्यावरच दारात येणाºयाला कसे पाठबळ द्यायचे, असा त्यांचा प्रश्न आहे.कांद्याच्या निर्यातबंदीचा विषय असो वा कांदा साठवणूक, या दोन्ही प्रश्नांनी कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी त्रस्त असताना बनकर यांनी बाजार समितीचे सभापती म्हणून सरकारच्या विरोधात कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.सरकारला सदरचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी शेतकरी उत्सुक असताना बनकर यांनी बाजार समित्या बंद करण्याचा निव्वळ इशारा देऊन आपली तलवार म्यान केली. त्यामुळे अशा ‘मौनी’भूमिका घेणाºयांना निवडणुकीत मते मागण्याचा अधिकार आहे काय, असा प्रश्न आता मतदारच विचारताना दिसत आहेत.रस्त्याची अक्षरश: चाळणीनाशिक-औरंगाबाद या राष्टÑीय महामार्गावर नैताळे ते पिंपळस रामाचेदरम्यान गेल्या काही वर्षांत प्रचंड खड्डे पडून अपघातांची मालिका सुरू झाली असताना एकदाही बनकर यांनी विरोधी पक्षाचा नेता म्हणून ना जनआंदोलन छेडले ना सरकारला जाब विचारण्याची भूमिका घेतली. एवढेच नव्हे तर त्यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाºया पिंपळगाव बसवंत ते निफाड या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाल्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. खुद्द बनकर यांनी या रस्त्याचा अनेकवेळा अनुभव घेतला असताना त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य का कळू शकले नाही, असा प्रश्न या परिसरातील मतदार विचारू लागले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nifadनिफाड