शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा वीज उपकेंद्राला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:15 IST

वीज उपकेंद्रावरून वीज वितरण कंपनीमार्फत होणारा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सदर वीजपुरवठा ...

वीज उपकेंद्रावरून वीज वितरण कंपनीमार्फत होणारा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सदर वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा दोन दिवसांत उपकेंद्राला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा अजमीर सौंदाण्याचे सरपंच धनंजय पवारांसह शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतीपंपासाठी होणारा वीजपुरवठा हा अतिशय कमी दाबाने होत अल्यामुळे पंप जळणे, स्टार्टर चालू न होणे, पाणी कमी उचलणे, केबल जळणे, ट्रान्सफाॅर्मर जळणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत. कांदा पीक काढणीला आले असून पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने तो आता जळण्याच्या मार्गावर आहे. महावितरणने वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, तसेच उपकेंद्राला टाळे ठोकू, असा इशारा शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीला निवेदनाद्वारे दिला आहे. विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. महावितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे.

निवेदनावर जितेंद्र पवार, तुषार पवार, गोकुळ नंदाळे, राम गायकवाड, दीपक शेवाळे, गोकुळ सोनवणे, रवींद्र पवार, अण्णा आहिरे, भीमा सोनवणे, दत्तू पवार, वसंत शेवाळे, नीलेश पवार, अशोक पवार, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.