शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

...तर नाशिकला मंत्रिपदाची लॉटरी?

By admin | Updated: October 21, 2014 02:01 IST

...तर नाशिकला मंत्रिपदाची लॉटरी?

नाशिक : भाजपाला राज्यात घवघवीत यश मिळाल्याने हा पक्ष सत्तेवर येणे अटळ असून, तसे झाल्यास नाशिक जिल्ह्यातून निवडून आलेल्या चार भाजपा उमेदवारांपैकी एकाला तरी मंत्रिपद मिळू शकते, असे मत मांडले जात आहेत. त्यादृष्टीने संबंधितांनी हालचाली सुरू केल्या आहेत.राज्यात सर्वच पक्ष स्वबळावर लढत असताना, भाजपाने १२३ जागा मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील चार जागांचा समावेश आहे. पूर्व नाशिक, पश्चिम नाशिक, मध्य नाशिक आणि चांदवड-देवळा मतदारसंघातून या पक्षाचे उमेदवार निवडून आले आहे. यंदाच्या निवडणुकाच मुळी स्वबळावर झाल्या. त्यात भाजपाला गत विधानसभेच्या तुलनेत चौपट यश मिळाले आहे. त्याचा विचार करता एक तरी मंत्रिपद (किमान राज्यमंत्री) या चार निर्वाचित उमेदवारांपैकी एकाला मिळण्याची शक्यता आहे. अन्य मागासवर्गीय म्हणून बाळासाहेब सानप आणि प्रा. देवयानी फरांदे हे दावेदारी करू शकतात. देवयानी फरांदे उच्चशिक्षित महिला म्हणून दावेदारी करू शकतात. दुसरीकडे मराठा कार्ड म्हणून डॉ. राहुल अहेर आणि सीमा हिरे हेदेखील दावेदारी करू शकतात. अर्थात, भाजपाचे सत्तेचे गणित कसे जुळते या सर्वावर हे अवलंबून आहे. त्यातही निवडून आलेले सर्वच उमेदवार प्रथमच विधिमंडळात पाऊल ठेवणार असल्याने त्याबाबत विचार होऊ शकतो. अशा स्थितीत मंत्रिपद नाही तर किमान महामंडळे मिळतील, अशी अपेक्षा आहे. तथापि, नाशिकला एक तरी मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा भाजपाचे पदाधिकारी बाळगून आहेत. (प्रतिनिधी)