शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसांनी कारवाईची धमकी देताच पुन्हा शटर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:14 IST

गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने पुन्हा ३० एप्रिलपर्यंत ...

गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने पुन्हा ३० एप्रिलपर्यंत बाजार पेठेत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिकच नव्हे तर राज्यातील व्यापाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे व्यापारी संघटनांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या शीर्ष संस्थेच्या नेतृत्वाखाली दोन दिवस मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निवेदन पाठवून तसे न झाल्यास शुक्रवारपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता नंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन दोन दिवस आंदोलन स्थगित करण्यात आले होते. दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन उध्दव ठाकरे यांनी दिले होते. परंतु नंतर लॉकडाऊनचा विषय पुढे आला त्यानंतर केाणताच निर्णय न घेतल्याने सविनय कायदे भंगाचे आश्वासन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी (दि.९) सकाळी शिवाजी रोड, मेनरोडसह काही भागात व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली. मात्र, पोलिसांनी कारवाईचा इशारा देताच शटर डाऊन करण्यात आले.

दरम्यान, दुकाने बंद असली तरी बाजारपेठेत गर्दी कमी नव्हती. रविवार पेठ आणि रविवार कारंजासह सर्वच ठिकाणी प्रचंड गर्दी किराणा दुकाने आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी झाली होती.

मुख्य बाजारपेठा वगळता उपनगर आणि विरळ वस्ती असलेल्या मार्गांवर अनेक ठिकाणी दुकाने सुरू होती. विशेषत: गुढीपाडव्यानंतर निर्बंध आणखी कठीण होणार या भीतीने गर्दी झाली होती.

इन्फो...

महापौरांकडून गर्दी टाळण्याचे आवाहन

राज्य शासनाने अगोदरचे निर्बंध कायम ठेवले असताना गेले दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन होते तसेच पुन्हा एक-दोन दिवसात आणखी कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता गृहीत धरून बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली हेाती. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी बाजारपेठेत जाऊन नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले. तसेच मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर पालनाचे आवाहन केले.

कोट...

बाजारपेठेतील दुकाने सकाळी उघडण्यात आली. मात्र, पोेलिसांनी ती बळजबरी बंद केली. मुळात आम्हाला संघर्ष करायचा नव्हता तर प्रशासनाच्या सहकार्याने दुकाने खुली करण्यात येणार होती. या आधीही दुुकाने बंद असल्याने शहरातील रुग्ण संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे अकारण व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये.

- संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲंड इंडस्ट्रीज