शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

‘समृद्धी’ महामार्गावर वाचणार वन्यप्राण्यांचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 01:17 IST

मुंबई-नागपूरला जोडणारा एक्स्प्रेस महामार्ग अर्थात महाराष्टÑ समृद्धी महामार्ग विकसित करताना दूरदृष्टीचा अवलंब करीत वन्यजीवांच्या संवर्धन व संरक्षणाचा विचार केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर तालुक्यांमधून जाणाऱ्या महामार्गावर एकूण सात ठिकाणी केवळ वन्यजिवांच्या हालचालींसाठी भुयारी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे ‘समृद्धी’वर मुंबई-आग्रा महामार्गाप्रमाणे वन्यजिवांचा जीव जाणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देवनविभागाकडून ‘झोन’ निश्चित मुक्तसंचारासाठी सिन्नर, इगतपुरीदरम्यान सात बोगदे

अझहर शेख । नाशिक : मुंबई-नागपूरला जोडणारा एक्स्प्रेस महामार्ग अर्थात महाराष्टÑ समृद्धी महामार्ग विकसित करताना दूरदृष्टीचा अवलंब करीत वन्यजीवांच्या संवर्धन व संरक्षणाचा विचार केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर तालुक्यांमधून जाणाऱ्या महामार्गावर एकूण सात ठिकाणी केवळ वन्यजिवांच्या हालचालींसाठी भुयारी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे ‘समृद्धी’वर मुंबई-आग्रा महामार्गाप्रमाणे वन्यजिवांचा जीव जाणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.सुमारे ७१० किलोमीटर लांबीचा समृद्धी विकास महामार्ग एकूण दहा ते बारा जिल्ह्यांमधील सुमारे ३५६ गावांमधून जातो. हा प्रकल्प येत्या २०२०पर्यंत पूर्णत्वास येणार असल्याचे बोलले जात आहे. ‘समृद्धी’वर ३१ टोलनाके असणार आहे. हा समृद्धी महामार्ग जंगलांच्या भागातूनही जाणार असल्याने महामार्ग विकसित करताना वन्यजिवांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे राष्टÑीय वन्यजीव संस्थेने ‘समृद्धी’ला संमती दर्शविली आहे.नुकतेच नाशिक पश्चिम वनविभागाकडून समृद्धी महामार्ग संबंधित कंपन्यांच्या अधिकाºयांनी इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांमधील वनपरिक्षेत्राची माहिती प्राप्त करून घेतली आहे. त्यानुसार या दोन्ही तालुक्यांमधील वनपरिक्षेत्रांतर्गत महामार्गावर वन्यजिवांकरिता भुयारी मार्ग तयार करून पर्यायी रस्ता उपलब्ध क रून दिला जाणार आहे. इगतपुरी वनपरिक्षेत्रात दोन, तर सिन्नर वनपरिक्षेत्रात एकूण पाच ठिकाणे सध्या निश्चित करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक टी.ब्यूला.एलील मती यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.‘रोडकिल’च्या समस्येला बसणार आळावन्यजिवांच्या मुक्तसंचार महामार्गालगतच्या वनक्षेत्रांमध्ये नेहमीच धोक्यात येतो. महामार्ग ओलांडतांना अनेकदा वाहनांच्या धडकेत वन्यजीव अपघातात जागीच गतप्राण होतात. ‘रोडकिल’ची वाढती समस्या वन्यजिवांच्या मुळावर उठली आहे. महामार्गावर वन्यजिवांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह खाण्यासाठी मृत प्राण्यांवर भूक भागविणारे अन्य वन्यजीव रात्रीच्या सुमारास तेथे येतात आणि त्यांचाही वाहनांखाली चिरडून मृत्यू होतो, अशा या ‘रोडकिल’च्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘समृद्धी’ विकसित करताना उपाययोजना केल्या जाणार आहे.येथे असणार प्राण्यांचा भुयारी मार्गसमृद्धी महामार्गावरील इगतपुरी वनपरिक्षेत्रातील बिबट्यांसह अन्य प्राण्यांचा वावर असलेल्या गावांच्या शिवारात दोन, तर सिन्नर वनपरिक्षेत्राच्या हद्दीत शिवडे, घोरवड, खंबाळे या तीन गावांसह अन्य दोन ठिकाणांवर भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. या भुयारी मार्गांमुळे वन्यप्राण्यांना थेट महामार्गाच्या विरुद्ध दिशेला सहजरीत्या सुरक्षित ये-जा करता येणार आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गwildlifeवन्यजीव