शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
8
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
9
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
10
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
11
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
12
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
13
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
14
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
15
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
16
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
17
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
18
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
19
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
20
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
Daily Top 2Weekly Top 5

आलात राजबाबू? या, घर तुमचंच आहे!

By admin | Updated: November 27, 2014 23:53 IST

आलात राजबाबू? या, घर तुमचंच आहे!

प्रिय राजबाबू,
एकदा नाशिकला समाचारासाठी जाऊन यायला पाहिजे, असा विचार करता करता या विचार करण्यातच आपला बराच वेळ निघून गेलेला दिसतो. मागच्या वेळी म्हणे आपण येता येता राहूनच गेलात. हरकत नाही. पण समाचाराच्या बाबतीत सहसा हयगय करु नये, असे म्हणतात. पण आपण कोणाच्या म्हणण्या न म्हणण्याला आजवर कधीच धूप घातलेली नसल्याने, हे व्यावहारिक शहाणपणदेखील आपल्या बाबतीत कुचकामीच म्हणायचे!
समाचाराचे आपल्या भाषेत दोन अर्थ निघतात हे मात्र आपण नक्कीच जाणत असणार. पण तितकंच कशाला, या दोन्ही अर्थांनी एकदा जाऊनच येऊ नाशकात, असाच आपला विचार असणार. आता एकाचवेळी दोन समाचार म्हणजे अंमळ जास्तीचा वेळ लागणारच की. तो जमवता जमवताच उशीर झाला ना? असो.
पाच वर्षांपूर्वी ज्या गावानं आपले एकदम तीन शिलेदार विधानसभेत पाठवून दिले आणि अर्धशतकाहून अधिकचे मावळे पालिकेत निवडून दिले, त्या गावाविषयी आपल्या मनात ममत्वाची भावना राहणारच की! आणि ती आहे म्हणूनच मागच्या वेळच्या तीन शिलेदारांपैकी दोघानी सरळ आपटी खाल्ली तर तिसऱ्यानी रणांगणाला सामोरे जाण्याच्या आधीच चक्क पाठ दाखवली म्हटल्यावर भले कितीही वाघाचं असलं तरी काळीज फाटून जाणारच की नाही? या तिघातील, तिसऱ्याचं जरा बाजूला राहू द्या. तो कोणाचाच कधी झाला नाही, तर तुमचा काय होणार? तरीही त्यानी तुमच्या गळी उतरुन आपल्या उत्तराधिकाऱ्याची सोय करुन घेतली. यात त्याचं बेरकेपण सरस ठरलं की तुमचं ‘भोळेपण’ सरस, याचा शरद पवारीय भाषेत निकाल घेणं तसं कठीणच. पण उरलेल्या दोघांचं तसं नव्हतं. त्यांची सारी भिस्त तुमच्यावरच. त्यांनी आपला करिष्मा अगदी जवळून बघितलेला आणि अनुभवलेला असताना, त्यांचा तेजोभंग व्हावा व त्यांच्या अनामतेलाही कुर्बान व्हावं लागावं, यालाच आंग्ल भाषेत ‘इन्सल्ट टू इन्जुरी’ म्हणतात, ना राजबाबू? तेव्हां त्यांच्या सांत्वनासाठी येणं हा तुमच्या इटिनररीमधला पहिला समाचार!
आपण एकेक मावळा अगदी निवडून निवडून घेतला, त्याच्यावर विश्वास टाकला, प्रत्येकातच आपण स्वत: राज ठाकरे बघितला आणि असे असताना या दोघांसकट आणखीही अनेकाना नाशिक जिल्ह्याने नाकारावं, यात कुठेतरी दगाफटका झाला असणार, या भावनेनं ओथंबून आणि दगाफटका करणाऱ्यांचा आता खरपूस घ्यावाच लागणार या मिषानं आपण आला असल्याने आपल्या अजेंड्यावरील हा दुसरा समाचार! होय की नाही?
अर्थात, या दुसऱ्या समाचारप्रसंगी काय होणार वा काय होऊ शकतं याची चुणुक आपल्या परवाच्याच एका वक्तव्यावरुन दिसून आली होती. होर्डींग्ज लावले तर सरळ पक्षातून काढून टाकू, असा सज्जड दमच आपण देऊन टाकला. बहुधा या वक्तव्यामधूनच मुंबई उच्च न्यायालयाने प्रेरणा घेतली असावी? चांगलं आहे.
आपण नाशकात अवतीर्ण झाल्यानंतर अगदी थेट प्रभागा प्रभागामध्ये जाऊन मावळ्यांची झडती घेणार असल्याचं आणि जे शिलेदार पराभवले त्यांना एकांतात बोलवून त्यांचा समाचार (पहिलावाला) घेणार असल्याचं ऐकिवात आहे. काय आहे, राजबाबू, आपण अखेर ठाकरे आहात, गर्दीचे आणि केवळ गर्दीचेच दर्दी आहात, तेव्हां प्रभागा प्रभागाचं राहू द्या, आख्ख्या नाशकातल्या साऱ्या मावळ्यांना एकझुंडीनं बोलावलं तरच कदाचित गर्दीचं दर्शन होईल असं आता नाशिककरांना उगाचंच वाटतं. ते खोटं ठरो, हीच मायभवानी जगदंबेच्या चरणी प्रार्थना!
आता थोडं विषयांतर. तुमच्या स्वत:च्या तुमच्याच मावळ्यांकडून खूप अपेक्षा आहेत. त्या असायलाही काही हरकत नाही. पण मग नाशिककरांनी तुमच्याकडून ज्या अपेक्षा बाळगल्या, त्यांचं काय करायचं? अर्थात या अपेक्षा तशा आपोआपच नाही वाढल्या. तुम्हीच त्या वाढवून ठेवल्या. आणि तसं म्हटलेलं कदाचित आपल्याला आवडणार नाही, पण या अपेक्षांची पार माती झाली की हो? तेव्हां नाशिककरांनी कोणाचा समाचार (दुसरावाला) घ्यायचा? पण पूर्वानुभव लक्षात घेता, तो प्रश्न नाशिककरांनी अन्य कोणावरही न सोडता, स्वत:च स्वत: सोडवून घेतला. वाईट वाटून घेऊ नका, पण नाशिककरांनी तो असा काही सोडवला की, ज्याचं नाव ते आणि आपल्या सांप्रतच्या दौऱ्यांचं प्रयोजनदेखील तेच आहे ना?
आपले कल्याण असो!
- इति लेखनसीमा