शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पाऊसाचा धुमाकूळ अन् शेतकऱ्यांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 9:05 PM

खामखेडा : नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवासापूर्वी बेमौसमी पावसाने तीन -चार दिवस धुमाकूळ घातल्याने शेती पिकांची धूळधाण झाली आहे. या पावसाने रब्बी पिकांची आशा उंचावेल आशी चर्चा होत असली तरी खरीपाचे नुकसान झाले ते भरून निघणारे नाही.

ठळक मुद्देरोपे आता पिवळी पडू लागल्याने खराब होऊ लागली आहे.

खामखेडा : नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवासापूर्वी बेमौसमी पावसाने तीन -चार दिवस धुमाकूळ घातल्याने शेती पिकांची धूळधाण झाली आहे. या पावसाने रब्बी पिकांची आशा उंचावेल आशी चर्चा होत असली तरी खरीपाचे नुकसान झाले ते भरून निघणारे नाही.खरीपाच्या प्रारंभापासून पावसाने शेतकऱ्यांची कसोटी पाहिली आहे. आता या कसोटीला उतरलेल्या शेतकºयांची खरी परीक्षा या निसर्गाच्या लहरीपणा पाहात आहे.गेल्या पंधरा दिवासापूर्वी अचानक वातावरणात बदल होऊन बेमोसमी पावसाने वादळी वाºयासह जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात झोडपुन काढले. त्यामुळे हताशी आलेल्या खरीपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सुरवातीला मुळातच पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नदी-नाले, धरणे कोरडे होते. त्यामुळे भुगर्भातील जलाशयाच्या पातळीत वाढ पाहिजे त्या प्रमाणात झाली नव्हती.दर वर्षी दिवाळी आधी खरीप पिकांची काढणी होत असे तसेच दिवाळी अगोदर पोळ कांद्याची काढणी होऊन कांदा दिवाळी पूर्वी विकला जात असे. परंतु चालु वर्षी पावसाअभावी लाल कांद्याची उशिरा लागवड झाल्याने दिवाळी नंतर लाल कांदा तयार होणार आहे. जो काही लवकर लागवड झाला आहे. तो अजूनही काढणीसाठी वेळ आहे.या अचानक आलेल्या या पावसामुळे शेतात कांद्याच्या वाफ्यात पाणी साचू लागल्याने शेतातील उभा काढणीस आलेला कांदा शेतातच सडण्याची शक्यता असते. तेव्हा कांद्यावर केलेला खर्च भरून निघतो की नाही यांची चिंता बळीराजा पडली आहे.खामखेडा परिसरातील शेतकरी मोठया प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून उन्हाळी कांद्याकडे पाहिले जाते. शेतकºयाकडे खरीपाचा कांदा फारसा नाही. त्यामुळे दिवाळी नंतर आहे त्या पाण्यावर उन्हाळी कांदा लागवडीची शेतकरी तयारी करीत असतो.मात्र गेल्या पंधरा दिवसापूर्वी झालेल्या बेमोसमी पाऊसाने लागवडीस आलेले व अत्यंत नाजुक असे रोपे आता पिवळी पडू लागल्याने खराब होऊ लागली आहे. आता पर्यत शेतकºयाने दोन वेळा उन्हाळी कांद्याचे बियाणे टाकली. परंतु या पाऊसाने ती ती तग धरु शकली नाहीत. त्यामुळे उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तसेच चालु वर्षी उशिरा पावसामुळे खरीपाच्या पेरणी उशिरा झाल्याने बाजरी, मका आदि पिकांची कापणी उशिरा झाल्याने शेतात उघड्यावर पडलेला मका व बाजरीचा कडबा या अवकाळी बेमोसमी पावसामुळे भीजुन गेल्याने तो काळा पडून शेतात सडून गेल्याने चाºयाची टंचाई आतापासून शेतकºयाला भासू लागली आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाने शेतीमालाची धूळधाण केली आहे. त्यामुळे आता पुढील नियोजन कसे करावे या चिंतेत शेतकरी सापडला आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी