शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांविरूद्ध जनतेचा कौल

By admin | Updated: February 24, 2017 23:46 IST

कॉँग्रेस, राष्ट्रवादीला फटका : भाजपाची ताकद वाढली

  संजीव धामणे : नांदगाव जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निकाल प्रस्थापितांना हादरा देणारे असले तरी यामागे सत्ताधाऱ्यांविरूद्धचा जो रोष जनतेच्या मनात खदखदत होता, त्याचेच प्रतिबिंब मतदानात दिसून आला आहे. त्यामुळे कॉँग्रेस, राष्ट्रवादीला नाकारत मतदारांनी शिवसेना, भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे. जिल्हा बँक, बाजार समित्या, दोन पालिका जिंकणाऱ्या शिवसेनेचे पुढचे लक्ष विधानसभा असणार आहे तर भाजपाला या निवडणुकीत संजीवनी मिळाल्याने यापुढे ते ही फॉर्मात असणार आहेत. गटात दोन व गणात पाच जागा मिळवून शिवसेनेचा भगवा झेंडा नांदगाव पंचायत समितीवर पंधरा वर्षांनी फडकला. भाजपाला गटात एक व गणात तीन जागा मिळाल्या. गटात जेमतेम एक जागा मिळविणाऱ्या काँग्रेसला गणात एकही जागा मिळवता आली नाही. राष्ट्रवादीचा पूर्णत: सफाया झाला. त्यांना गट व गण यात एकही जागा मिळाली नाही. न्यायडोंगरी गटाच्या लक्ष्यवेधी लढतीत नातीकडून आजीला पराभव पत्करावा लागला. शिवसेनेचा वारू काँग्रेसने रोखला. या ठिकाणी शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजन झाले. गटात शिवसेनेला रोखण्यात काँग्रेसला यश मिळाले असले तरी न्यायडोंगरी गणात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्याने या यशाला क्रॉस व्होटिंगच्या लोकापवादाची झालर लागली. अनिल अहेरांच्या एकखांबी तंबूला त्यांचे बंधू विलास आहेर यांनी या निवडणुकीत प्रथमच हादरा दिला. दोघांचे नातेसंबंध व बहुतांश कार्यकर्ते सारखेच.. त्यामुळे या सर्वांची यावेळी मोठी फरफट झाली. साकोरे गटात राष्ट्रवादीवर बंडखोरीचे सावट आले. गट व दोन्ही गणात राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. भुजबळांचे निकटवर्तीयांनी बंडखोरी केल्याने आमदार पंकज भुजबळ यांनी हा गट प्रतिष्ठेचा करून ही, त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. घाटमाथ्यावरचा जातेगाव गट तर केवळ स्वयंप्रेरणेवर लढला. येथील बोलठाण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. जातेगाव गणात भाजपाच्या विजयाचे अप्रूप आहे. गट व शेजारच्या मांडवड गणात शिवसेना उमेदवार विजयी होत असताना याच ठिकाणी झालेला भाजपाचा विजय वेगळ्याच समीकरणांकडे घेऊन जातो. समाज मनाची छुपी मानसिकता हा चिंतनाचा विषय आहे. यापुढील काळात संजय पवार यांच्या हाती तालुक्यातील भाजपाची सूत्रे असणार आहेत. हा बदल लक्षणीय आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी विजयानंतर यापुढे सुहास कांदे हेच शिवसेनेचा विधानसभेचा चेहरा असतील हे भाकीत जाहीरपणे केले असले तरी पुढील काळात बरेच पाणी वाहणार आहे. या निवडणुकीच्या निकालाने बापूसाहेब कवडे हेच किंग मेकर आहेत. ही बाब सिध्द झाली आहे. पंधरा वर्षांपूर्वी सेनेची सत्ता पंसवर आली तेव्हा ते व संजय पवार एकत्र होते. नगरपालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी सोडून माजी आमदार संजय पवार भाजपात दाखल झाले. मात्र भाजपाला एकही जागा पालिकेत मिळाली नव्हती. जि.प. - पं.स.मध्ये एक गट व तीन गणांमध्ये त्यांचे उमेदवार विजयी झाले. तालुक्यात शिवसेना लढली ती सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली व बापूसाहेब कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली. राज्यमंत्री दादाभाऊ भुसे यांचे मोठे योगदान यात आहे. तथापि नांदगाव तालुक्याच्या राजकारणात कांदे आल्यानंतर येथील बहुतांश शिवसेना एका सूत्रात बांधली गेल्याचे चित्र आहे.2002 नंतर तब्बल पंधरा वर्षांनी नांदगाव पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. घड्याळ व पंजा नंतर भगवे राज अवतरले आहे. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारणाचा नारा देणाऱ्या शिवसेनेने ग्रामीण भागाच्या पाणी, रस्ते या समस्यांसह शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे शिवबंधन बांधावे, अशी अपेक्षा आहे. अर्थात त्यांचा मुकाबला भाजपा गण सदस्यांशी आहे. पंचायत समिती चालविताना भाजपाचे सहकार्य सेना घेणार की दोहोंचा संघर्ष बघायला मिळणार ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे.