शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

जाधव बंधूंच्या हत्येप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:38 IST

भर उन्हात ठिय्या आंदोलन : एक तास वाहतुकीचा खोळंबा

नाशिक : उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रंगपंचमीच्या दिवशी झालेल्या जाधव बंधूंच्या हत्याकांडात जे पोलिस अधिकारी व कर्मचारी सामील असतील त्यांच्यावर बडतर्फीची कार्यवाही करावी, शासनामार्फत या परिवारास तत्काळ ५० लाखांची मदत व एका व्यक्तीस सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, आदी मागण्यांसाठी कडक उन्हात आंबेडकरी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.

यावेळी पोलिस प्रशासनाच्या कामकाजाविरोधात निदर्शनेही केली. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रंगपंचमीच्या दिवशी दोघा भावांची हत्या घडली होती. याप्रकरणी तपास करण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष चौकशी समितीची स्थापना करत समितीच्या प्रमुखपदी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांची नियुक्ती केली होती; पण या घटनेला पंधरा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही आरोपींना अटक व इतर तपासासंदर्भामध्ये उशीर होत असल्याचा आरोप करीत त्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत पोलिस प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले.

या प्रकरणातील दोषी पोलिसांचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी केली. भर उन्हात उपनगर पोलिस ठाणे हद्दीतून निघालेला हा मोर्चा शालिमार, एमजी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पोलिस प्रशासनाविरोधातील फलक हातात घेऊन यावेळी आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. यामुळे सीबीएसकडून अशोकस्तंभाकडे जाणारी एकेरी वाहतूक तब्बल तासाभरासाठी ठप्प झाली होती.

टॅग्स :Nashikनाशिक