शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

धरणातील बेकायदा उपसा रोखण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 1:44 AM

टंचाईसदृश परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेल्या पाण्याचा बेकायदा उपसा रोखण्याबरोबरच पाणीपुरवठा योजनांची गळती रोखण्याची व विहिरींच्या लगतच्या ५० मीटर अंतरातील सर्व विहिरींच्या पाणी उपसा बंद करण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

नाशिक : टंचाईसदृश परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेल्या पाण्याचा बेकायदा उपसा रोखण्याबरोबरच पाणीपुरवठा योजनांची गळती रोखण्याची व विहिरींच्या लगतच्या ५० मीटर अंतरातील सर्व विहिरींच्या पाणी उपसा बंद करण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.  आठ तालुक्यांत सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पेरणी केलेली पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी सर्व संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक मंगळवारी घेतली. जिल्ह्यात ९७ टक्के पेरण्या झालेल्या असल्या तरी, सध्या पूर्व भागातील पिकांना पाण्याची गरज आहे. पाऊस न पडल्यास पेरणी वाया जाणार आहे. काही धरणांमध्ये जेमतेम साठा असून, त्यातून पाणीउपसा केला जात असल्याच्या प्रकारावर चर्चा करण्यात आली. धरणातील पाणी पिण्या- साठीच ठेवण्याची पावले उचलावी लागतील ते लक्षात घेता, पाटबंधारे खात्याने पाणी उपसणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.  त्याचबरोबर धरणातून पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी उचलताना होणारी गळती त्या त्या यंत्रणांची रोखावी, असे आदेश देऊन पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी साठवण करणाºया विहिरींच्या ५० मीटर परिघात नवीन विहिरी खोदण्यास अनुमती न देतानाच बोअर घेण्यावर बंदी घालण्याची तसेच जुन्या विहिरी असतील तर त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.  या बैठकीत सरकारने दुष्काळसदृश परिस्थितीच्या बदललेल्या निकषाची माहिती महसूल, कृषी व गट विकास अधिकाºयांना देण्यात आल्या. प्रत्येक महिन्यात पडणारा सरासरी पाऊस, झालेल्या पेरण्या व त्यानंतर पिकाची परिस्थिती अशा तीन टप्प्यांत त्याची पाहणी करण्याचे व उत्पादनावर होणाºया परिणामावरच यापुढे दुष्काळ जाहीर केला जाणार असून, त्यासाठी आॅगस्ट महिन्यात पडणाºया पावसावर सारी भिस्त असणार आहे. अशा परिस्थितीत सर्व विभागांनी अचूक माहिती सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

टॅग्स :DamधरणWaterपाणी