शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
5
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
6
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
7
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
8
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
9
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
10
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
11
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
12
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
13
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
14
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
15
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
16
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
17
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
18
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
19
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
20
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीला पाणी देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:09 IST

कळवण तालुक्यातील पुनंद धरणातून सटाण्यातील जलवाहिनीला पाणी देण्यास विरोध होत असून, यासाठी शनिवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. सटाणा पालिकेला पाणी देण्यास व जलवाहिनी टाकण्यास कळवण तालुका व पुनंद खोºयातील शेतकºयांचा तीव्र विरोध असून, शनिवारी पिळकोस, विसापूर, भादवण, बिजोरे, खामखेडा, सावकी, चाचेर यांसह सुळे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, सरपंच, सोसायटी सभापती, तरुण शेतकरी, लोकप्रतिनिधींनी एकत्र येत शेतकरी मेळावा घेतला.

पिळकोस : कळवण तालुक्यातील पुनंद धरणातून सटाण्यातील जलवाहिनीला पाणी देण्यास विरोध होत असून, यासाठी शनिवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. सटाणा पालिकेला पाणी देण्यास व जलवाहिनी टाकण्यास कळवण तालुका व पुनंद खोºयातील शेतकºयांचा तीव्र विरोध असून, शनिवारी पिळकोस, विसापूर, भादवण, बिजोरे, खामखेडा, सावकी, चाचेर यांसह सुळे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, सरपंच, सोसायटी सभापती, तरुण शेतकरी, लोकप्रतिनिधींनी एकत्र येत शेतकरी मेळावा घेतला.या मेळाव्यात मानूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य भारती पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, तालुकाध्यक्ष रामकृष्ण जाधव, शांताराम जाधव, सखाराम वाघ, मोहन जाधव, अण्णा शेवाळे, बाजीराव गुंजाळ, प्रवीण रौंदळ, दादाजी बोरसे यांनी उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन केले. दरम्यान, रक्त सांडावे लागले तरी चालेल पण परिसरातील एकही शेतकरी आपल्या शेतातून सटाणा शहरासाठी जाणारी पाइपलाइन खोदू देणार नाही, अशी शपथ सर्व शेतकºयांनी घेतली. जलवाहिनीला विरोध करण्यासाठी पुनंद सुळे कालवा संघर्ष कृती समितीचे गठन करण्यात आले. बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. जलवाहिनीस परिसरातील सर्व गावांचा व शेतकºयांचा विरोध असून, स्थापन करण्यात आलेल्या समितीला पाठिंबा दर्शविण्यात आला. सटाणा शहरवासीयांचा नैसर्गिक हक्क हा केळझर धरणावर असून, त्यांना कळवण तालुक्यातील धरणातील पाणी हे पाइपलाइनद्वारे कदापिही जाऊ दिले जाणारनाही. यासाठी शेतकरी शेतात पाइपलाइन खोदू देणार नाहीत. जर शासनाला सटाणा शहरवासीयांना पाणी द्यायचे असल्यास ते कालव्याद्वारे किंवा नदीद्वारे द्यावे, अशी भूमिका शेतकºयांनी मांडली आहे. अन्यथा आज या आंदोलनाची ठिणगी पडली आहे त्या ठिणगीचे आगीत रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा यावेळी शेतकºयांनी दिला आहे. याविरोधात आंदोलना स शेतकºयांनी तयार रहावे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी आपल्या मनोगतात यावेळी सांगितले. यावेळी पुनद डावा कालव्यावर अवलंबून असलेल्या गावातील शेतकºयांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रामकृष्ण जाधव ,शांताराम जाधव,आण्णा शेवाळे यांनी या लढाची पुढील आखणी केली असून येत्या १५ आॅगस्ट ला या कालव्यावर अवलंबून असलेल्या गावातील ग्रामपंचायत ,सोसायटी व विविध संघटनांचे ठराव केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी व शासनदरबारी याचा पाठपुरावा करण्यासाठी पुनद दावा कालवा संघर्ष समतिी गठन करून मोहन जाधव , सखाराम वाघ ,कारभारी पवार ,बाजीराव गुंजाळ , प्रल्हाद गुंजाळ रवींद्र गुंजाळ, दीपक गुंजाळ, हेमंत गुंजाळ ,या तरु ण शेतकº्यांची या समितीवर नेमणूक करण्यात आली आहे.