शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
5
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
6
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
7
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
8
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
9
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
10
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
11
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
12
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
13
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
14
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
15
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
16
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
17
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
18
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
19
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
20
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
Daily Top 2Weekly Top 5

हृदयविकारात आदिवासी मुलांचे प्रमाण अधिक

By admin | Updated: April 30, 2015 00:01 IST

कुपोषणाचे बळी : वैद्यकीय उपचारांच्या जागृतीचाही अभाव

संकेत शुक्ल ल्ल नाशिक
विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो दूर असणारे आदिवासी आणि त्यांची मुले केवळ कुपोषणाचेच बळी ठरतात असे नसून जनजागृतीचा अभाव आणि त्यामुळे आलेल्या अज्ञानामुळे त्यांना स्वत:च्या आरोग्याचेही भान राहत नाही. परिणामी अनेक आजारांना बळी पडण्याचे प्रमाण आदिवासी बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे उघड झाले आहे.
आदिवासी भागात मुलांमध्ये असलेले कुपोषण हा नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरतो. त्यावर उपाययोजना म्हणून केवळ पौष्टिक खाद्य देऊन त्यांचा आरोग्यस्तर वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. शासनाच्या या प्रयत्नांत अंगणवाडी सेविकांचा सहभाग मोलाचा असला, तरी केवळ पौष्टिक खाद्य देऊन हा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुळात बालकांचा जन्म सुदृढ व्हावा यासाठी शहरात जितकी काळजी घेतली जाते तितकी ग्रामीण भागात आणि विशेषत: आदिवासी भागात घेतली जात नाही. त्यातच दारिद्र्य आणि दुष्काळ या दुहेरी संकटात सापडलेल्या बहुतांश आदिवासी समाजातील गरोदर स्त्रियांना पुरेसे पोषक अन्न न मिळाल्याचा परिणाम म्हणून आदिवासी भागातील बालके मोठ्या प्रमाणात विविध आजारांना बळी पडत असल्याचे दिसून आले आहे.
हृदयाला असलेल्या विविध आजारांसंदर्भात हृदयविकारतज्ज्ञ मनोज चोपडा यांनी आदिवासीबहुल ग्रामीण भागात केलेल्या पाहणीदरम्यान त्यांना ही गोष्ट आढळली आहे. मागील वर्षभरात त्यांनी नंदुरबार, तळोदा, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर, हिंगोली, परभणी यांसह विविध ग्रामीण भागात केलेल्या पाहणीत हृदयाचा आजार असलेली सुमारे ३५० मुले सापडली. त्या मुलांमध्ये हृदयाच्या दोन कप्प्यांमधील छिद्र (ए.एस.डी.), हृदयाच्या दोन मोठ्या कप्प्यांमधील छिद्र (व्ही.एस.डी.), दोन महारोहिणीं-मधील छिद्र (पी.डी.ए.), डाव्या किंवा उजव्या बाजूची झडप बंद अशी अनेक मुले आढळली.
त्या मुलांमधील ५ ते १५ वर्षे वयोगटातील ७८ मुलांच्या हृदयाला छिद्र आढळले. त्या मुलांवर डॉ. चोपडा यांनी उपचार केले. आज ती मुले ठणठणीत आहेत. साधारणत: मुलांच्या विविध अवयवांची वाढ ही गर्भावस्थेतच होत असते. एक टक्का मुलांमध्ये पुरेशी वाढ न झाल्याने हा प्रश्न उद्भवतो. शहरापेक्षा ग्रामीण भागात आणि त्यातही आदिवासी कुटुंबांमध्ये हा प्रश्न मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे त्यांच्यातील दारिद्र्य आणि दुसरे म्हणजे अज्ञान. विविध औषधांच्या माध्यमातून बाळाचा विकास चांगला होऊ शकतो; परंतु त्याचे ज्ञान नसल्याने गर्भवती स्त्रियांना पौष्टिक अन्न आणि उपचार मिळत नाहीत. त्यामुळे गर्भाची वाढ अपरिपक्वरीत्या होते. आदिवासी समाजात असलेले अनेक समजही त्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळेच आदिवासी मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असते. ते टाळण्यासाठी जनजागृतीची गरज आहे.
- डॉ. मनोज चोपडा, हृदयविकारतज्ज्ञ