शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत

By admin | Updated: January 20, 2017 23:57 IST

मुक्त विद्यापीठ : तांत्रिक अडचणीचा विद्यार्थ्यांना फटका

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेशअर्ज अपूर्ण असल्याने त्यांचा प्रवेश धोक्यात आला आहे. अर्ज दाखल करताना अर्जात अनेक त्रुटी राहिल्याने विद्यार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे, तर कागदपत्रे अ‍ॅटेच करूनही संगणकावर नसतील तर त्यास विद्यार्थी जबाबदार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.  सन २०१६-१७ च्या शिक्षणक्रमासाठी मुक्त विद्यापीठाने आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेश अर्ज दाखल केले आहेत. यातील सुमारे १३,७८० विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्णतेच्या कारणास्तव बाद करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना आता २५ तारखेपर्यंत अर्जांची पूर्तता करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी त्यांना ३०० रुपये भरावे लागणार आहे. आॅनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रक्रिया पूर्ण केलेली असताना संकेतस्थळावर माहिती उमटत नसेल तर त्यास विद्यार्थ्यांचा दोष काय? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. अर्ज अपूर्ततेचे कारण देताना विद्यापीठाने शैक्षणिक प्रमाणपत्र अ‍ॅटेच नसल्याचे कारण सांगितले आहे तर काही विद्यार्थ्यांना अ‍ॅटेच केलेले कागदपत्र अदृश्य स्वरूपात असल्याचे म्हटले आहे. हा सर्व तांत्रिक भाग असताना विद्यार्थ्यांनी ३०० रुपयांचा भुर्दंड का सोसावा? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला आहे.  अर्जातील त्रुटी दुरुस्तीबाबतचा विनंती अर्ज, प्रवेश अर्जाची प्रोफाइल प्रत, प्रवेश पात्रतेची कागदपत्रे, बॅँक चलन आणि त्रुटींची दुरुस्ती करण्याचे शुल्क ३०० आकारण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी त्यास हरकत घेतली आहे. अर्ज पडताळणी करताना आढळेल्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे अडचणीत आलेले प्रवेश दुरुस्त करण्यासाठी विद्यापीठाने संधी दिल्याचे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे त्रुटींची पूर्तता करण्याचे सांगण्यात आले असून, सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रतीदेखील स्पीड पोस्टाने पाठविण्याचे बंधनकारक करण्यात आल आहे. यावरून विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केली आहे.  ई-मेलने अर्जाची पूर्तता करण्याते म्हटले असतानाही पुन्हा स्पीड पोस्टाने कागदपत्रे मागविण्यात आल्यामुळे विद्यापीठाला आपल्या तांत्रिक यंत्रणेवर विश्वास नसल्याचा आरोप विद्यार्थीवर्ग करीत आहेत.
(प्रतिनिधी)