शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

शेतमाल पेटवून नुकसान करणा-या महिलेस रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 19:24 IST

नाशिक : शेतक-यांनी शेतात रचून ठेवलेल्या तयार शेतमालास काडी लावून पेटवून देत नुकसान करणा-या महिलेस म्हसरूळ शिवारातील शेतकरी मुकुंद पुंडलिक सूर्यवंशी (रा. नक्षत्र ड्रिम, रासबिहारी लिंक रोड, नाशिक) यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना रविवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास रासबिहारी लिंकरोडवरील सूर्यवंशी यांच्या शेतात घडली़ इंदुबाई शंकर मोराडे (रा. तोरणे मळा, म्हसरूळ शिवार, नाशिक) असे शेतमालाचे नुकसान करणा-या संशयित महिलेचे नाव आहे़ म्हसरूळ पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे़

ठळक मुद्देम्हसरूळ शिवारातील घटना : दीड वर्षात सतरा शेतक-यांचे लाखोंचे नुकसान

नाशिक : शेतक-यांनी शेतात रचून ठेवलेल्या तयार शेतमालास काडी लावून पेटवून देत नुकसान करणा-या महिलेस म्हसरूळ शिवारातील शेतकरी मुकुंद पुंडलिक सूर्यवंशी (रा. नक्षत्र ड्रिम, रासबिहारी लिंक रोड, नाशिक) यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना रविवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास रासबिहारी लिंकरोडवरील सूर्यवंशी यांच्या शेतात घडली़ इंदुबाई शंकर मोराडे (रा. तोरणे मळा, म्हसरूळ शिवार, नाशिक) असे शेतमालाचे नुकसान करणा-या संशयित महिलेचे नाव आहे़ म्हसरूळ पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे़मुकुंद सूर्यवंशी यांचे म्हसरूळ शिवारातील रासबिहारी लिंकरोडवर सर्व्हे नंबर १३९, १४० व १४२ येथे शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात पाळीव जनावरांसाठी भुईमुगाचा पाला व गवत रचून ठेवलेले होते़ रविवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास ते आपल्या पत्नीसह भाजीपाला विक्री करून घरी परतत होते़ त्यांना शेतात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ते तत्काळ शेतात पोहोचले असता त्यांना एक महिला पळताना दिसली़ त्यांनी प्रथम आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर पाठलाग करून पकडले असता ती इंदूबाई मोराडे असल्याचे समोर आले़ सूर्यवंशी यांनी तत्काळ या महिलेस म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देत फिर्याद दिली़गत दीड वर्षांपासून म्हसरूळ शिवारातील सुमारे सतरा शेतक-यांचे तयार झालेले गहू, हरभरा, सोयाबीन, भुईमूग, भोपळे, टमाटे ही पिके तसेच जनावरांसाठी शेतात रचून ठेवलेले गवत, जनावरांचे शेड व घरास आग लावून पेटवून दिल्याच्या घटना घडल्या आहेत़ याबाबत शेतक-यांनी वारंवार तक्रारी देऊनही संशयितास पकडण्यात म्हसरूळ पोलिसांना यश आले नव्हते़ विशेष म्हणजे गतवर्षी मुकुंद सूर्यवंशी यांनी शेतात रचून ठेवलेल्या पाच एकर सोयाबीन पिकास आग लावून जाळल्याची घटना घडली होती़ अखेर या संशयितास पकडण्यात शेतक-यांनाच पुढाकार घ्यावा लागला आहे़पोलिसांचे शेतक-यांना अजब सल्लेसूर्यवंशी यांच्या शेतातील पाच एकर सोयाबीन ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाळण्यात आली आहे़ त्यावेळी शेतातील कामगाराने एका महिलेला पळताना बघितलेही मात्र तिला पकडण्यात यश आले नव्हते़ या घटनेनंतर म्हसरूळ ग्रामस्थांनी मारुती मंदिरासमोर घेतलेल्या ग्रामसभेत म्हसरूळ पोलीस ठाण्यातील अधिकाºयांना बोलावले असता शेतात सीसीटीव्ही कॅमरे बसवा, वॉचमन ठेवा, हॅलोजन लावा, चोरट्यांना रंगेहाथ पकडून आमच्या ताब्यात द्या, असे अजब सल्ले देण्यात आले होते़

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीfireआगPoliceपोलिसCrimeगुन्हा