शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारीही कुशावर्तावर स्रान

By admin | Updated: September 14, 2015 22:09 IST

त्र्यंबकेश्वर : देशभरातून आलेल्या भाविकांची अलोट गर्दी

त्र्यंबकेश्वर : पूर्वी श्रावण महिन्यात जास्त गर्दी झाली तर सिंहस्थ पर्वणीची अनुभूती आली असे संबोधले जायचे, आता मात्र यंदा सिंहस्थाच्या दुसऱ्या शाहीस्रानाला येथे भरणाऱ्या संत निवृत्तिनाथ यात्रेएवढी जेमतेम गर्दी होती. रविवारी साधारणत: पाच लाख भाविकांनी दुसऱ्या मुख्य पर्वणीचा लाभ घेतला. परंतु शाहीस्रानाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी येथे भाविकांनी अलोट गर्दी करून कुशावर्तावर स्रान केले. महाराष्ट्र शासनाने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २८०० कोटी, तर केंद्र शासनाने ५०० कोटी असे एकूण ३३०० कोटी रुपये खर्च केले. सिंहस्थासाठी त्र्यंबक नगरपालिकेला जवळपास ६० कोटींच्या आसपास निधी आला होता. अर्थात यातील बहुतेक निधी (कामांसाठीचा) जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीशिवाय खर्च होऊ शकला नाही. याव्यतिरिक्त प्रत्येक यंत्रणेसाठी मिळालेला निधी पाहता त्र्यंबकेश्वर व सर्व यंत्रणेमार्फत काही निधी खर्च झाला. नाशिकला भरपूर निधी मिळाला. तथापि झालेली गर्दी पाहता व येणारी एक सिंहस्थ पर्वणी मिळून झालेली गर्दी केवळ १० ते १२ लक्ष होईल. कदाचित त्यापेक्षा आकडा कमी होईल, मात्र सिंहस्थाचा प्रचार, प्रसार होण्यास महाराष्ट्र शासन कमी पडले. उलट त्र्यंबकेश्वर-नाशिकला होणारी गर्दी आणि त्यामुळे दोन्हीही ठिकाणे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे, असा प्रचार केल्याने देशभरातून भाविकांचा ओघ कमी झाला. तरीही आलेले भाविक उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब, राजस्थान, बंगाल, कर्नाटक राज्यातून आले होते.बंदोबस्त काहीसा शिथिल केला असला तरीही थोडीफार आगळीक काही अधिकारी आणि पोलिसांकडून झालीच. अनेकांना गचांड्या मारल्या तर काहीजण रांगेत असूनही त्यांना कुशावर्तावर जाताना झालेल्या गर्दीमुळे रांगेतून काढून देण्यात आले. हमारे भक्तों को कातारसे बाहर निकाला न जाय या साधूंच्या मागण्या पूर्ण करण्यास प्रशासनाने धन्यता मानली.तथापि, रांगेमधील भाविकांशी असे वागले असते तर पोलिसांना त्यांच्याकडूनही दुवा मिळाला असता. अनेक महिला रडत होत्या तर अनेकांना आपल्या नातेवाइकांना भेटू दिले नाही. त्र्यंबकला साधे वर्तमानपत्रांचे पार्सलदेखील आले नाही. मागच्या पर्वणीलादेखील वर्तमानपत्रांचे पार्सल असणारे वाहन शहरात येऊ दिले नाही अन्य सुविधा (भाजीपाला वगैरे) व्यवस्थित दिल्या. अनेक ठिकाणी अन्य कर्मचाऱ्यांकडून अरेरावी केली गेली, लोकांनी पादत्राणे काढली की, ती पादत्राणे त्वरित कचरा गाडीत टाकून बाजूला गोळा केली जायची. अनेक भाविकांनी चपला शोधण्याकडे दुर्लक्ष केले. कोणाला वेळच मिळाला नाही. एस.टी. बसगाड्यांची संख्या, खासगी वाहने, आखाड्यातील भक्त अशी संख्या चार लाखांच्या वर पोहोचली. एकंदरीत भाविक असे कमीच आले. डोक्यावर दहशतवादी हल्ल्याची अनामिक भीती घेऊन ! (वार्ताहर)