शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी धमकावल्याची तक्रार

By admin | Updated: January 20, 2017 00:06 IST

त्र्यंबकेश्वर : जागा खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा जमीनमालकाच्या वारसांचा आरोप

त्र्यंबकेश्वर : येथे नाशिक कृउबा समितीने खरेदी केलेल्या जागेच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले असून, याबाबत मूळमालकांना नाशिक कृउबाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी धमका-वल्याची तक्रार दाखल केली आहे. त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी भाऊ मोरे यांची गट नं. १०४ एकूण क्षेत्र १ हेक्टर ७० आर शेतजमीन होती. सन १९७२ साली या जमिनीतून १ हेक्टर १७ आर क्षेत्र त्र्यंबकेश्वर सहकारी भातगिरणी यांना (दक्षिणेकडील) विक्री केले होते. त्यासाठीचे रितसर खरेदीखतही झालेले होते. भातगिरणीने ०.५ गुंठे जागा शेतकरी सहकारी संघास विक्री केली होती. तसेच ५८.५ क्षेत्र कृउबा समितीला विक्र ी केले, तर ५८.५ क्षेत्र नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेला विक्री करण्यात आले आहे. उर्वरित उत्तरेकडील क्षेत्र मूळ मालक मयत गणपत भाऊ मोरे यांच्या सध्याच्या वारसांच्या कब्जेवहिवाटीत आहे. त्यांनी आपल्या ३० गुंठे क्षेत्रात तारेचे कुंपण केले आहे. दरम्यान, संपूर्ण गटाची मोजणी केली असता गटाच्या दक्षिणेकडील गट नं. १०५च्या मालकाचे २५ गुंठे जागेत अतिक्रमण झाल्याचे जागेच्या नकाशावरून दिसत आहे. याबाबत जमीनमालकाच्या वारसांनी दिलेल्या तक्रारीत संबंधित लोकांनी पोलीस ठाण्यातदेखील १०००/५०० माणसे आणून रातोरात कुंपण तोडण्याची धमकी दिली आहे. वास्तविक, महाराष्ट्र को-आॅप. बँकेने जागा जप्त केलेली असताना पोलीस ठाण्यातच संबंधितांनी बळाचा वापर करून धमकी देण गैर आहे. बाजार समितीने दिलेल्या तक्र ार अर्जात म्हटले आहे की, जागेबाबत न्यायालयीन वाद चालू असून, निकाल लागेपर्यंत तारेचे कुंपण लावू नका. निकाल लागल्या-नंतर रितसर चतु:सीमेप्रमाणे खुणा करून त्यानंतरच कुंपण लावावे. येथे मराठा विद्याप्रसारक समाजाने आपल्या इमारतीचे बांधकाम करताना बाजार समितीच्या जागेकडे बांधकाम केले आहे, तर गट नं.१०५ (दक्षिणेकडे) गेलेली सुमारे २५ गुंठे जागा सोडून दिली आहे. त्यामुळेच हा वाद उद्भवला असल्याचे बोलेले जात आहे. सध्या तरी लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेल्या जागेमागे शुक्लकाष्ट लागले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गत दोन ते तीन पंचवार्षिकपासून त्र्यंबकेश्वरला उपबाजार आवार सुरू करू तसेच शेतकऱ्यांच्या युवावर्गासाठी बाजार समितीतर्फे गाळे उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देऊन मते मिळविली; शेवटी ते स्वप्नच राहिल्याने नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)