शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

मालेगाव : कुलजमात तन्जीम संघटनेची मागणी बॉम्बस्फोट निकाल प्रकरणाची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:11 AM

आझादनगर : बॉम्बस्फोटातील संशयितांची झालेली सुटका, त्यानंतर न्यायाधीशांनी दिलेला राजीनामाळे सरकारने या निकालाविरोधात अपिल करावे, अशी मागणी केली आहे.

आझादनगर : हैदराबाद येथील मक्का मशीद बॉम्बस्फोटातील सर्व संशयितांची पुराव्याअभावी झालेली सुटका, त्यानंतर विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिलेला राजीनामा या घटनाक्रमामुळे मालेगाव कुलजमात तन्जीमने सखेद आश्चर्य व्यक्त करीत याची सखोल चौकशी करीत आंध्र प्रदेश सरकारने या निकालाविरोधात अपिल करावे, अशी मागणी केली आहे. आलेल्या निकालामुळे अस्वस्थ होत कुलजमात तन्जीमची मंगळवारी सकाळी ११ वाजता बडा कब्रस्तान येथे बैठक झाली. या बैठकीदरम्यान मौलाना अब्दुल हमीद अझहरी यांनी सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. देशातील सर्वच बॉम्बस्फोट प्रकरणांत संशयितांना मोकळीक दिली जात आहे, तसेच वकिलांवर दबाव आणला जात आहे. सुन्नी जमातचे मौलाना सुफी गुलाम रसूल यांनी या निकालाबाबत आश्चर्य व्यक्त केले. अजमेर, मक्का मशीद, मालेगाव येथील बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा कबुलीजबाब असिमानंदने दिला होता. तरीही मृतांना न्याय मिळत नसेल तर या विरोधात अस्वस्थतेची भावना निर्माण होणे साहजिक आहे. निकाल दिल्यानंतर न्यायाधीशांनी राजीनामा देणे यामुळे या खटल्याप्रती संशय व्यक्त होत असून, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी जमात अहेले हदीसचे मौलाना शकील फैजी, जमात-ए-इस्लामीचे मौलाना फिरोज आझमी, मौलाना अब्दूल बारी, हाजी हनिफ साबीर, अकबर शेख आदी उपस्थित होते. दि. १८ मे २००७ रोजी जुमाच्या नमाजवेळी मक्का मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये नऊ जण ठार तर ५८ जण जखमी झाले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी स्वामी असिमानंद यांनी याबाबत न्यायालयात कबुलीजबाब दिला होता. हा खटला एनआयएच्या विशेष न्यायालयात सुरू होता. न्यायालयाने सोमवारी संशयित सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.