शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

काकडगावी लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ

By admin | Updated: October 12, 2015 23:52 IST

उपक्रम : पावसाने ओढ दिल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प

द्याने : बागलाण तालुक्यातील काकडगाव येथे लोकसहभागातून धरणातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य सुनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पावसाने ओढ दिल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प झाली. हरणबारी पूरपाणी पोहोचले नसल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. गावाशेजारील धरणातून सरपंच नंदलाल आहिरे ग्रामस्थांनी काढ काढण्याचा निर्णय घेतला. धरणाची उंची वाढल्यास परिसरातील शेतीचा व पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे, असे प्रतिपादन सरपंच नंदलाल आहिरे यांनी केले.यावेळी जि.प. सदस्य सुनिता पाटील. पंचायत समिती सभापती जिजाबाई सोनवणे, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, गटविकास अधिकारी बी. एम. बहिरम, मंडल अधिकारी विस्तार अधिकारी एस. एस. महाले, नामपूरचे सरपंच प्रमोद सावंत, किरण अहिरे, अशफाक पठाण, सी. पी. अहिरे, तलाठी डी. टी. साळवे, धीरज कापडणीस, सरपंच नंदलाल अहिरे, सदस्य विनोद पाटील, निंबा सोनवणे, संगीता गरूड, कुसुम अहिरे, ज्योत्स्रा पवार, स्ािंधुताई पाटील, पोलिस पाटील राजाराम पाटील, रामचंद्र अहिरे, देवराम अहिरे, महादू अहिरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जि.प. सदस्य सुनिता पाटील यांनी शासनाच्या विविध योजना व पाणी अडवा पाणी जिरवा योजना राबविण्यात याव्यात, असे आवाहन केले. त्र्यंबकला धडक मोहीमत्र्यंबकेश्वर : त्र्यंबक तालुक्यात कृषी विभागातर्फे वनराई बंधारे बांधण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली असून, ही मोहीम पंचसूत्री अभियानाअंतर्गत वसुंधरा पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून निवडण्यात आली आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील इतर गावांमध्ये वनराई बंधारे बांधण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी दिली.उपविभागीय अधिकारी गोकुळ वाघ, अजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे बंधारे बांधण्यात आले. या गावांमध्ये मेट चंद्राची, टाकेहर्ष, नांदगाव (कोहळी), वरस विहीर, टाकेदेवगाव, देवडोंगरा, पिंपळद, बेझे, चाकोरे, आळवंड, तोरंगण, वाघेरे, कोटंबी, गडदवणे आदि गावात नुकतेच वनराई बंधारे बांधण्यात आले. वनराई बंधारे बांधण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक आदिंनी प्रयत्न केले. तसेच यापुढेही असे बंधारे बांधण्यासाठी सर्व अधिकारी प्रयत्नशील राहणार असल्याचे सूर्यवंशी यांनी दिली.दरम्यान, तालुक्यात परतीचा पाऊस चांगला झाल्याने ग्रामस्थांच्या श्रमदानाने सर्व कृषी सहायक यांनी तालुक्यात धडक मोहीम राबविली असल्याचे दृश्य परिणाम दिसत आहेत. बांधलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे डिसेंबरअखेर ओहळ, नाले यामध्ये पाणी टिकून राहणार आहे.(वार्ताहर)