शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
3
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
5
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
6
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
7
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
8
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
9
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
10
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
11
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
12
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
13
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
14
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
15
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
16
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
17
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
18
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
19
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
20
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित

जलजागृती चळवळ उभी करणे गरजेचे : कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:39 AM

शहरी व ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जलजागृती चळवळ उभी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता के. भा. कुलकर्णी यांनी केले आहे. जलजागृती सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

नाशिक : शहरी व ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जलजागृती चळवळ उभी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता के. भा. कुलकर्णी यांनी केले आहे. जलजागृती सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. येथील परशुराम साईखेडकर सभागृहात जलजागृती सप्ताहाचा समारोप करण्यात आला. कुलकर्णी पुढे म्हणाले, पाण्याचे महत्त्व जाणूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते त्यामुळे पाण्याचा अतिरिक्त वापर टाळणे गरजेचे आहे. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनेवर भर दिला गेला पाहिजे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत हे उद्दिष्ट समोर ठेवून काम केले तरच ते शक्य आहे. जलतज्ज्ञ सुरेश कुटे यांनी पाणी हा जीवनशैलीचा भाग असल्याने जलजागृती केवळ सप्ताहापुरती मर्यादित न राहता याविषयी निरंतर प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. अधीक्षक अभियंता राजेश मोरे यांनी प्रास्ताविकात जलजागृती सप्ताहानिमित्त आयो जित उपक्रमांची माहिती दिली.  गिरणा नदी खोरे प्रकल्प यांनी ‘पाण्याला लागली तहान’ हे लघुनाट्य, तर नाना साळवे यांनी वामनदादा कर्डक यांची ‘पाणी वाढ गं माय’ ही कविता सादर केली. कार्यक्रमास महापालिकेचे शहर अभियंता ए. व्ही. धनाईत, कार्यकारी अभियंता प्रवीण गायकवाड, दिलीप मुसळे, राजेश शिंदे, गिरीश सौंदाणी आदी उपस्थित होते. जल दिनानिमित्त रांगोळी, चित्रकला आदी विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तत्पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विक्रम गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह ‘व्यथा’ या एकांकिकेचा प्रयोग सादर केला. त्यातून शिक्षण, पाणी, आरोग्य, जलसंवर्धनाचे महत्त्व मांडण्यात आले. तृप्ती बोरसे हिचे ‘पाणीप्रश्न आणि मी’ या विषयावर व्याख्यान झाले.

टॅग्स :Waterपाणी