शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

आघाडी सरकारमुळेच जायकवाडीची जबाबदारी नाशिकवर : देवयानी फरांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:45 PM

जायकवाडी धरण बांधले गेले तेव्हापासून आजपर्यंत फक्त पाच वेळा हे धरण भरले आहे. या धरणाची क्षमता ८१ टी.एम.सी. असली तरी धरणाची वार्षिक सरासरी ४१ टी.एम.सी. इतकी आहे. २००५ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने गोदावरी पाटबंधारे महामंडळाची स्थापना करून समन्यायी पाणी वाटपाचा कायदा संमत केल्यामुळे ४० टी.एम.सी. पाण्याची तूट भरून काढण्याची जबाबदारी नाशिकवर आली असल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे.

ठळक मुद्देकायद्याचा गैरवापर : आडगाव ग्रामस्थांतर्फे जाहीर सत्कार समारंभात आरोप

आडगाव : जायकवाडी धरण बांधले गेले तेव्हापासून आजपर्यंत फक्त पाच वेळा हे धरण भरले आहे. या धरणाची क्षमता ८१ टी.एम.सी. असली तरी धरणाची वार्षिक सरासरी ४१ टी.एम.सी. इतकी आहे. २००५ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने गोदावरी पाटबंधारे महामंडळाची स्थापना करून समन्यायी पाणी वाटपाचा कायदा संमत केल्यामुळे ४० टी.एम.सी. पाण्याची तूट भरून काढण्याची जबाबदारी नाशिकवर आली असल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे.गंगापूर व पालखेड धरणांतील पाणी जायकवाडीला जाण्यापासून वाचविल्याबद्दल आडगाव ग्रामस्थांच्या वतीने आमदार देवयानी फरांदे यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर नगरसेवक उद्धव निमसे, नगरसेवक सुरेश खेताडे, नगरसेविका शीतल माळोदे, माजी नगरसेवक मधुकर मते, पोलीस पाटील एकनाथ मते, संजय तुंगार उपस्थित होते. आ. फरांदे म्हणाल्या, फक्त पिण्याच्या पाण्याची तरतूद असती तर यदा कदाचित आपल्याला मोठा तोटा झाला नसता पण समन्यायी पाणी वाटपामुळे आपल्याकडील १० तालुके दुष्काळी असूनदेखील आपल्या हक्काचे पाणी सोडावे लागत आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे सरकारचे हात बांधलेले पण त्यावर मार्ग म्हणून मी गोदावरी पाटबंधारे महामंडळाला मुकणे धरणातून पाणी सोडण्याचे सांगितले तरीही त्यांनी काहीही म्हणणे ऐकून न घेता, धरणातून काही पाणी सोडले पण कोर्टाच्या निकालातील तरतुदीचा आधार घेत आपली बाजू ऐकायला भाग पाडून त्यांना मुकणे धरणात पिण्याचे आरक्षित असलेले पाणी सोडण्याची विनंती केल्यामुळे गंगापूर धरणाचे दरवाजे बंद झाले आणि शेतीसाठी पाणी वाचवू शकले. असे असले तरी ही लढाई एवढ्यात संपणार नसल्याचे सांगत सर्वांनी पाण्यासाठी राजकीय भेद विसरून एक होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी नगरसेवक उद्धव निमसे, माजी नगरसेवक मधुकर मते, पोलीस पाटील एकनाथ मते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पाणीवाटप संस्था स्थापन कराआमदार फरांदे यांनी शेतकऱ्यांना, ‘पाणी आपल्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’ या युक्तीप्रमाणे गावागावात पाणीवाटप संस्था स्थापन करून आपल्याला आवश्यक पाण्याची मागणी नोंदवा त्यावेळी तुमच्या मागणीचा विचार केला जाईल, नाही तर आपल्याकडील शेतकºयांना पश्चात्ताप करावा लागेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकDevyani Farandeदेवयानी फरांदेJayakwadi Damजायकवाडी धरण