शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

द्राक्ष वेलींवर खोडकिडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 18:49 IST

शिरवाडे वणी : येथील परिसरात उन्हाळ्याचा वाढत्या तीव्रतेमुळे द्राक्ष वेलींवर खोड किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक हैराण झाले आहे. त्याचा परिणाम द्राक्षाच्या उत्पादन खर्चावर होत आहे.

ठळक मुद्देशिरवाडे वणी परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

शिरवाडे वणी : येथील परिसरात उन्हाळ्याचा वाढत्या तीव्रतेमुळे द्राक्ष वेलींवर खोड किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक हैराण झाले आहे. त्याचा परिणाम द्राक्षाच्या उत्पादन खर्चावर होत आहे.मागील वर्षापासून कोरोना रोगाने थैमान घातले असल्यामुळे यावर्षीचा द्राक्षाचा हंगाम द्राक्ष उत्पादकांना समाधानकारक असाच गेला. तसेच द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, त्यातच द्राक्ष वेलींवर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढत चालली आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून दीर्घ कालावधीनंतर रणरणत्या उन्हाबरोबरच वन्यजीव प्राण्यांबरोबरच नागरिकांचीसुद्धा काहिली होत आहे. उन्हाचा पारा ३८ अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे द्राक्ष वेलीवर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.उन्हाच्या तीव्र माऱ्यामुळे खोड अळी ही वेलींच्या खोडाला छिद्र पाडून आतून वेलींच्या मुळाकडून पानांना अन्नसाठा पुरविणारा भागच पोखरून भुशाच्या रूपाने तो त्या छिद्रातून बाहेर टाकताना दिसत आहे. खोडकिडीच्या या उपद्रवामुळे द्राक्षवेल ही आतून पोकळ होऊन पानांना अन्नसाठा न मिळाल्यामुळे निस्तेज व निकामी होऊन पाने पिवळी पडणे, काडी व्यवस्थित तयार न होणे, वेलीला माल कमकुवत निघणे, वेलीला माल आल्यानंतर घडांचे पोषण न होता कुपोषित झाल्याचे प्रकार घडणे, परिणामी द्राक्ष वेली कमकुवत होऊन उत्पादन खर्च वाढून उत्पन्न कमी मिळते.खोड अळी ही द्राक्षवेलीच्या बुडापासून ते शेंड्यापर्यंत कोणत्याही ठिकाणी छिद्र पाडून पोखरण्याचे काम चालू करीत असते. खोड अळीच्या नियंत्रणासाठी अतिशय महागड्या स्वरूपाचे औषधे ठिबक सिंचनमधून सोडावी लागतात अथवा छिद्र पाडलेल्या ठिकाणाहून इंजेक्शनद्वारे औषध सोडून त्यांचा नायनाट करावा लागतो. त्याचा परिणाम उत्पादनाचा खर्च वाढीवर काही प्रमाणात होत असतो, यात शंकाच नाही.शक्यतो खोड अळीचा प्रादुर्भाव हा द्राक्षाची काढणी झाल्यानंतर अथवा तीव्र उन्हाळ्यातच जाणवत असतो. खोड अळीचा बंदोबस्त वेळीच न केल्यास कालांतराने जास्त वाढल्याने द्राक्षवेली समूळ काढण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर येत असते. द्राक्षाची लागवड झाल्यापासून किमान दोन वर्षांनंतरपासून अळीचा हा प्रादुर्भाव सुरू होत असतो व खोड अळीचे नियंत्रण आटोक्यात न आल्यास ४ ते ५ वर्षांची वेल असतानादेखील उत्पादन क्षमता कमी झाल्याने द्राक्ष वेली काढून त्या ठिकाणी नवीन लागवड करावी लागत असते.परिणामी खर्चात वाढ होत असते. मागील दोन महिन्यांच्या तुलनेत सध्यातरी उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे द्राक्ष वेलीवर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादक हैराण झाले आहेत. (०५ ग्रेप्स)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी