शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

‘देव द्या, देवपण घ्या...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:26 IST

नदी आणि नदीमधील जलचर प्राणी यांचे रक्षण व्हावे, त्यांना कुठल्याही प्रकारे पीओपीच्या मूर्ती आणि त्यावरील रासायनिक रंगांचा त्रास होऊ नये, या उद्देशाने शहरातील तरुणाई सात वर्षांपूर्वी एकत्र आली. विद्यार्थी कृती समिती नावाने या तरुणाईच्या गोदा सेवकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढचे पाऊल टाकले. ‘मूर्ती दानाचे महत्त्व अन् काळाची गरज’ या विषयावर माहिती पत्रक तयार करून त्यांचे वाटप व मूर्ती संकलनाचे ‘देव द्या, देवपण घ्या’ नावाने अभियान हाती घेतले.

नदी आणि नदीमधील जलचर प्राणी यांचे रक्षण व्हावे, त्यांना कुठल्याही प्रकारे पीओपीच्या मूर्ती आणि त्यावरील रासायनिक रंगांचा त्रास होऊ नये, या उद्देशाने शहरातील तरुणाई सात वर्षांपूर्वी एकत्र आली. विद्यार्थी कृती समिती नावाने या तरुणाईच्या गोदा सेवकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढचे पाऊल टाकले. ‘मूर्ती दानाचे महत्त्व अन् काळाची गरज’ या विषयावर माहिती पत्रक तयार करून त्यांचे वाटप व मूर्ती संकलनाचे ‘देव द्या, देवपण घ्या’ नावाने अभियान हाती घेतले. २०११ साली या तरुणाईच्या समितीने हा उपक्रम पहिल्यांदा राबविला. गंगापूररोड-हनुमानवाडी लिंकरोडच्या प्रारंभी गोदापार्क ही जागा यासाठी निश्चित केली गेली. खरे तर सदर परिसर अत्यंत उच्चभ्रू समजला जातो; मात्र तरीही तरुणाईला काही दगडांचा प्रसाद सुरुवातीला मिळाला. मात्र यामधून खचून न जाता हाती घेतलेला उपक्रम अखंडित राबविण्याची जिद्द प्रत्येकाच्या मनात होती. यामुळे आजतागायत उपक्रम सुरू असून, पहिल्या वर्षात आलेला कटू अनुभव पुन्हा आला नसल्याचे या समितीचे प्रमुख आकाश पगार सांगतात. दरम्यान, मूर्ती दान करणाºया भक्ताचे नाव, पत्ता, क्रमांक आदी माहिती नोंदवून घेतली जाते. यावेळी ध्वनिक्षेपकावरून संबंधित भक्तांचे अभिनंदन करत आभार मानले जाते. संकलित झालेल्या मूर्ती महापालिकेच्या वाहनांमध्ये सुपूर्द केल्या जातात. विशाल गांगुर्डे, रोहित कळमकर, जयंत सोनवणे, सागर बाविस्कर, प्रशांत खंडाळकर, राहुल मकवाना, सिद्धांत आमले, विजय विश्वकर्मा, पूजा सावंत, नेहा सूर्यवंशी, जागृती आहेर, दीपाली जाधव आदी. नाशिककरांमध्ये जागृती झाली आणि त्याचे फलित म्हणून मागील वर्षी सुमारे १७ हजार मूर्तींचे संकलन करण्यास या समितीला यश आले. समितीचे दीडशे-दोनशे स्वयंसेवक यासाठी प्रयत्नशील आहेत. दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. दरम्यान, घरोघरी जाऊन माहिती पत्रकांचे वाटप करून त्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्नही केला जात आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी कृत्रिम तलावाची व्यवस्था करत समितीद्वारे मूर्ती संकलन केले जाते. यावेळी भाविकांना बाप्पाची आरती करण्यासाठी योग्य जागेची व्यवस्थाही करून दिली जाते.