शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
2
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
3
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
4
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
6
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
7
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
8
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
9
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
10
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
11
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
12
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
13
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
14
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
15
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
16
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
17
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
18
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
19
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

शासकीय तलावात खोदल्या विहिरी

By admin | Published: December 12, 2015 11:57 PM

कारवाईची मागणी : परिसरातील शेतकरी संतप्त

येवला : सुरेगाव शिवारात शासकीय मालकीच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेल्या सुमारे ५० एकर क्षेत्रातील तलावात काही शेतकरी दांडगाईने विहिरी खोदत असून, या विहिरी तत्काळ बुजवाव्यात, अशी मागणी येथील सुमारे ५० शेतकऱ्यांनी थेट तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, तलाठी पातळीवर तात्पुरते काम बंद केले असले तरी पुन्हा दांडगाईने काम सुरू केले जाण्याची शक्यता निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. शासनाने तळे राखावे आणि आमच्या जनावरांना पाणी चाखायला राहू द्यावे, असे आवाहन करून या तलावात असलेल्या विहिरी कायमस्वरूपी बुजवून टाकाव्यात आणि बेकायदेशीर विहिरी खोदणाऱ्या शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सुरेगाव शिवारात पालखेड डाव्या कालव्यालगत शासकीय मालकीच्या ५० एकर क्षेत्रात १९७२ साली दुष्काळी कामात हा तलाव तयार केला आहे. पिंपळखुटे या वनक्षेत्र शिवाराजवळ हा तलाव आहे. पालखेडच्या पाण्याने हा तलाव आवर्तनाच्या दरम्यान भरून दिला जातो. गवंडगाव, सुरेगाव, पिंपळखुटे, तळवाडे देवळाणे, भुलेगावसह परिसरातील हरणे, शेळ्यामेंढ्या व इतर जनावरे मोठ्या संख्येने पाणी पिण्यासाठी या तलावावर येतात. या बंधाऱ्यालगत शेतकऱ्यांच्या ५० ते ६० विहिरी त्यांच्या खासगी क्षेत्रात पूर्वीपासून आहेत. परंतु काही शेतकऱ्यांनी कायद्याला गुंडाळून थेट तलावातच चार विहिरी खोदण्याचा उद्योग केला. दोन विहिरी तर पूर्णत्वास गेल्या आहेत. दरम्यान, तहसीलदार शरद मंडलिक यांनी या कार्यक्षेत्रातील चोपडे या तलाठी कर्मचाऱ्याला पाठवून सदर विहिरीचे काम बंद केले असले तरी कायमस्वरूपी या तलावातील विहिरी पूर्णत: बुजवून टाकाव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे. भाऊसाहेब भागवत, गणेश भागवत, रामेश्वर गायकवाड, सुभाष साळुंके, विलास भागवत, सिराज सय्यद, सोन्याबापू भागवत, फकीरा भागवत, ईश्वर सोमासे, बाबासाहेब पवार यांच्यासह ५० शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)