शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नियोजनाच्या नावाखाली उधळपट्टी

By admin | Updated: March 2, 2016 00:23 IST

माजी महापौरांचा आरोप : पाणीपट्टी वाढीस विरोध

नाशिक : सन २०११ मध्ये गंगापूर धरणात फेबु्रवारीअखेर २१ टक्के पाणीसाठा होता. त्यावेळी पाणीकपातीची गरज भासली नाही. आता ३४ टक्के पाणीसाठा असताना पाणीपुरवठा नियोजनाच्या नावाखाली ११ कोटी रुपये खर्चाचा घाट घातला जातो आहे, असा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला असून, पूर्ण सुविधा दिली जात नसताना पाणीपट्टीत २० टक्के वाढ कशासाठी, असा सवालही उपस्थित केला आहे. सध्या महापालिकेकडून सुरू असलेली पाणीकपात आणि पाणीपट्टीत दरवाढीची स्थायीने केलेली शिफारस याबाबत पत्रकार परिषदेत दशरथ पाटील यांनी परखड मते मांडली. पाटील यांनी धरणातील सन २००१ पासूनची पाणीसाठ्याची आकडेवारी समोर ठेवत अनेक प्रश्न उपस्थित केले. पाटील यांनी सांगितले, गंगापूर धरणातील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन केल्यास नाशिककरांवर लादलेली पाणीकपात दूर होऊ शकेल. परंतु पाणीपुरवठा नियोजनाच्या नावाखाली ११ कोटी रुपये खर्चाचा डाव आखला गेला आहे. सध्या शहरात ५० टक्क्यांहून अधिक पाणीकपात सुरू असल्याचा दावाही पाटील यांनी केला. नाशिककरांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असून, महापालिकेने वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवली पाहिजे. आयुक्तांकडून परिस्थितीचे नीट अवलोकन केले जात नाही आणि त्यासाठी त्यांच्याकडे वेळही नाही. शहरात पुरेसा पाणीपुरवठा केला जात नाही आणि स्थायी समिती प्रशासनाच्या तालावर नाचत पाणीपट्टीत २० टक्के दरवाढ करण्यास मंजुरी देत आहे. सदर पाणीपट्टी महासभेने फेटाळून लावावी. अगोदर पूर्ण सेवा द्या, मगच करवाढीचा अधिकार महापालिकेला पोहोचतो. महापालिकेने आठ दिवसांत पाणीकपात मागे न घेतल्यास अपूर्ण सेवेबद्दल न्यायालयात जाण्याचा इशाराही पाटील यांनी दिला.