शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचा दलितमुक्ती हा केवळ आरंभबिंदू

By admin | Updated: April 26, 2015 01:24 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचा दलितमुक्ती हा केवळ आरंभबिंदू

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचा दलितमुक्ती हा केवळ आरंभबिंदू होता. त्यांचे अंतिम लक्ष्य हे हिंदू समाजाला अंधश्रद्धांपासून मुक्त करणे होते, असा दावा ज्येष्ठ लेखक रमेश पतंगे यांनी केला. आंबेडकरांना ठराविक चौकटीत बंदिस्त करणे हे त्यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वावर अन्याय करण्यासारखे ठरेल, असेही ते म्हणाले. साप्ताहिक विवेक व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने पतंगे लिखित ‘सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी आपली भूमिका स्पष्ट करताना ते बोलत होते. शंकराचार्य संकुल येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायकदादा पाटील होते. न्यासाचे अध्यक्ष राजाभाऊ मोगल विचारमंचावर उपस्थित होते. पतंगे म्हणाले की, बाबासाहेबांवर टोकाचा भक्तिभाव व्यक्त करणारी व टीका करणारी अशी दोन्ही गटांची माणसे समाजात आहेत. बाबासाहेबांबद्दल बुद्धीमध्ये वाळवी निर्माण करण्याचे काम काही लोक करीत आहेत. बाबासाहेबांचा लढा हा हिंदू धर्मशास्त्राविरोधात होता, हिंदू परंपरा नष्ट झाल्याशिवाय समता प्रस्थापित होणार नाही, असाही एक मतप्रवाह आहे. तथापि, डॉ. आंबेडकर यांचे समग्र व्यक्तिमत्त्व अत्यंत व्यापक होते. दलितमुक्ती हा त्यांच्या कामाचा केवळ आरंभबिंदू होता. हिंदू समाजाला अंधश्रद्धांपासून मुक्त करणे हे त्यांचे लक्ष्य होते. देशातील स्त्रियांची प्रगती, बाळंतपणाची रजा, बालविवाहावर बंदी, मुलांना पित्याच्या संपत्तीत वाटा, कामगारांना आठ तासांच्या कामाची मर्यादा आदि अनेक गोष्टींचे श्रेय बाबासाहेबांचे असल्याचेही ते म्हणाले.
विनायकदादा पाटील यांनी सांगितले की, मोठ्या कलाकृती, व्यक्तिमत्त्वे समजण्यास कठीण असतात. आपले वय वाढते, तसतशी ती अधिक कळत जातात. आंबेडकर, गांधी व विवेकानंद या व्यक्तिमत्त्वांनी सृष्टीला धक्के दिले. आंबेडकरांना एखादा धर्म जखडून ठेवू शकत नाही. ते युगप्रवर्तक नेते होते. अशा व्यक्ती माणूस नव्हे, तर देवत्वाचे अधिकारी असतात, सृष्टीचे उद्रेक असतात.
प्रारंभी शीतल खोत यांनी ‘साप्ताहिक विवेक’विषयी माहिती दिली. ‘पांचजन्य’ व ‘आॅर्गनायझर’च्या आंबेडकर विशेषांकांचेही प्रकाशन करण्यात आले. रवींद्र बेडेकर यांनी गीत सादर केले. बापू जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. (प्रतिनिधी)