शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाध्यक्षपदाच्या चर्चेत डॉ. फोंडके, देवी यांचेही नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:14 IST

नाशिक : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची घोषणा दोन दिवसांवर आली असताना महामंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयांकडून त्या विभागातील नावांची यादीदेखील महामंडळाला ...

नाशिक : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची घोषणा दोन दिवसांवर आली असताना महामंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयांकडून त्या विभागातील नावांची यादीदेखील महामंडळाला पोहोचवण्यात आली आहे. त्यात मुंबई विभागाकडून प्रख्यात विज्ञान कथा लेखक डॉ. बाळ फोंडके यांचे तसेच मावळत्या संमेलनाध्यक्षांकडून प्रख्यात साहित्यिक गणेश देवी यांचे नाव महामंडळाकडे पाठविण्यात आले आहे.

नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची अधिकृत घोषणा रविवारी (दि.२४ ) करण्यात येणार आहे. त्यापूर्वी महामंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयांकडून संबंधित विभागातील नावे साहित्य महामंडळाच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहेत. त्यात मुंबई विभागाने विज्ञान कथा लेखक डॉ. बाळ फोंडके यांचे नाव पुढे केले आहे, तर महामंडळाच्या परंपरेनुसार मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी प्रख्यात साहित्यिक आणि भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचे नाव पुढे केले आहे. त्यामुळे आता संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. यंदाच्या साहित्य संमेलनासाठी प्रथमच दोन विज्ञान कथा लेखकांची नावे पुढे आल्याने त्यातून कुणाच्या नावाची निवड होते की मावळत्या संमेलनाध्यक्षांचा पर्याय विचारात घेतला जातो, त्यावरदेखील चर्चा रंगू लागली आहे.

---इन्फो---

डॉ. फोंडके यांचे नाव प्रथमच

डॉ. फोंडके यांचे मूळ नाव गजानन पुरुषोत्तम फोंडके असले तरी ते डॉ. बाळ फोंडके नावानेच प्रख्यात आहेत. अंतराळ, आपले पूर्वज, खगोल, पशू-पक्षी, प्राणिजगत, भूगोल ही सहा पुस्तके त्यांनी ‘विज्ञान नवलाई' नावाच्या पुस्तक-मालिकेत लिहिली आहेत. काहीकाळ ते ‘सायन्स टुडे’ या मासिकाचे संपादकदेखील होते. विज्ञान सोप्या भाषेत उलगडून सांगण्यात त्यांचा हातखंडा असल्याने विज्ञान कथा वाचकांचे ते लाडके लेखक आहेत.

---देवी यांचे नाव सातत्याने चर्चेत---

भाषाविषयक प्रचंड मोठे काम तसेच आदिवासी समाजाच्या उत्थानासाठीचे मोठे कार्य केलेल्या डॉ. गणेश देवी यांचे नाव गत दशकापासूनच चर्चेत आलेले आहे. त्यांच्या स्थेच्या माध्यमातून देशभरातील ७८० बोलीभाषांचेदेखील सर्वेक्षण करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. साहित्य अकादमी पुरस्कारासह देशाच्या पद्मश्री पुरस्कारानेदेखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.