शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:49 IST

गेल्या वर्षभरानंतर शाळा, महाविद्यालये आता हळूहळू पूर्वपदावर येत असून सिन्नर आगाराकडून मात्र कमी बस असल्याकारणाने खेडेगावातील शालेय विद्यार्थ्यांची ...

गेल्या वर्षभरानंतर शाळा, महाविद्यालये आता हळूहळू पूर्वपदावर येत असून सिन्नर आगाराकडून मात्र कमी बस असल्याकारणाने खेडेगावातील शालेय विद्यार्थ्यांची ताराबंळ होत आहे. ग्रामीण भागात प्रत्येक खेडोपाडी नियमित येणारी एकच बस फेऱ्या मारत असल्याने विद्यार्थी बसच्या खाली राहिला तर परत बस फेरी मारून येईपर्यंत शाळेची वेळ निघून जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते. तालुक्यातील ठाणगाव,पाडळी,आडवाडी, सोनांबे, कोनांबे, दापूर, पाढुर्ली आदी पश्चिम भागातील खेडेगावातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची शिक्षणासाठी सिन्नरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी ये-जा होत असते. सिन्नर आगारातील कमी बस सेवेमुळे शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी कमी बस असल्याने विद्यार्थ्यांना तासनतास बसावे लागत आहे. सिन्नर आगारातील केवळ ५५ गाड्यांनीच संपूर्ण प्रवाससेवा सुरू आहे. सिन्नर आगारातील १० बस मुंबई येथे वाहतुकीसाठी देण्यात आलेल्या आहेत. या बस पुन्हा बोलविणे गरजेचे असून याबाबत सिन्नर आगाराच्यावतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना एक दिवसाआड शाळा असल्याने विद्यार्थी पास काढण्यासाठी कोणीही पुढे सरसावत नाही. त्यामुळे आगाराच्यावतीने दररोजचे उत्पन्न वाढण्यासाठी बस फेऱ्या वाढविण्याची मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे .

कोट....

ग्रामीण भागातून येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी पास काढून घ्यावे. जितक्या प्रमाणात पास वाढले जातील त्याप्रमाणे त्या-त्या भागातील बसेसची संख्या वाढविण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांकडून पूर्ण महिनाभराच्या पासची रक्कम आकारणी केली जात नसून फक्त दहा दिवसांचीच आकारणी केली जात आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी पास काढून घ्यावेत म्हणजे त्या भागात बसेस सोडता येतील.

- एस. एच. काळे, स्थानक प्रमुख

कोट....

पूर्वी आगारात असलेली वाहनांची स्थिती पूर्ण केल्यास कामगारांना नियमित कामगिरी मिळणेस सुलभ होऊन विद्यार्थी संख्या व प्रवासी संख्या वाढ होत असल्याने बसेस वाढ होणे गरजेचे आहेत.

- देवा सांगळे, सचिव, एसटी कामगार सेना