शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी एकादशीचा फराळ मागणी वाढल्याने महागला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 14:47 IST

त्र्यंबकेश्वर : आषाढी वारीवर जसा कोरोनाच्या प्रभावामुळे परिणाम झाला तसाच तो फराळाच्या पदार्थांवर देखील जाणवत आहे. यंदा सर्वच फराळाचे पदार्थ महाले असुन लॉकडाउनमुळे जनता घरातच बसुन आहे. वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने हातावर कामकरणाऱ्या लोकांना आषाढीचा एक प्रकारे उपवास घडत आहे.

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : आषाढी वारीवर जसा कोरोनाच्या प्रभावामुळे परिणाम झाला तसाच तो फराळाच्या पदार्थांवर देखील जाणवत आहे. यंदा सर्वच फराळाचे पदार्थ महाले असुन लॉकडाउनमुळे जनता घरातच बसुन आहे. वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने हातावर कामकरणाऱ्या लोकांना आषाढीचा एक प्रकारे उपवास घडत आहे.आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांचा उपवास असल्याने उपवासाच्या पदार्थांना विशेष मागणी असल्याने व्यावसायिकांनी संधीचा फायदा घषत सदर व्तूंच्या दरात वाढ केली. आता हाच उपवास उद्या द्वादशीला सोडला जाईल.सकाळीच संत शिरोमणी तथा वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यु निवृत्तीनाथ महाराज यांच्या नित्य नैमित्तीक परंपरे प्रमाणे एकादशीची महापुजा पुजारी तथा विश्वस्त जयंत महाराज गोसावी यांनी केली. यावेळी त्र्यंबकेश्वर मधील शेकडो भाविकांनी श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदीराचे ते बंद असल्याने बाहेरु नच दर्शन घेत होते. दुसरा उपाय नव्हता. गावातील शेवरे गल्लीतील असलेल्या गायधनी यांच्या वेद पाठशाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदीरात दर्शनासाठी भाविक दर्शनासाठी अधुन मधुन येत होते. फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर लोक स्वत:च करीत होते. निवृत्तीनाथ समाधी मंदीरातील विठ्ठल रखुमाई मंदीर समाधी मंदीरच बंद असल्याने तेथेही भाविक बाहेरूनच दर्शन घेत होते.दरम्यान आषाढीच्या फराळाच्या पदार्थमधील रताळी १२०, साबुदाणा ७०, शेंगदाणे ११०, खजुर १२०, गुळ ५०, बटाटे २५ रुपये किलो दराने विकले जात होते. तर केळीचा भाव ३० ते ४० रुपये डझन होता.त्र्यंबकेश्वर येथुन गेलेली संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुका मंगळवारी (दि.३०) शिवशाही बसने रात्री उशीरा पोहचल्या. पारंपारिकरित्या ज्या मानाच्या विशेष सात पालख्या आहेत. त्यांचे दर्शन देखील क्र मवारी होत असते. त्र्यंबकेश्वर येथुन गेलेल्या निवृत्तीनाथ यांच्या पारखीचा चौथा क्र मांक होता.नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथुन गेलेली पालखीचा महाराष्ट्रातील मानाच्या पालखीमध्ये समावेश आहे. याचा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरसह नाशिक जिल्ह्याला भुषणावह आहे.

टॅग्स :businessव्यवसायMarketबाजार