शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Top Marathi News LIVE Updates: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
4
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
5
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
6
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
7
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
8
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
9
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
10
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
11
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
12
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
13
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
14
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
15
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
16
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
17
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
18
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
19
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
20
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशाची वाटचाल अराजकतेकडे

By admin | Updated: January 6, 2017 00:44 IST

शरद पवार : राष्ट्रवादीच्या मेळाव्यात नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

 नाशिक : नोटबंदीच्या निर्णयाने शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक, उद्योजक अशा समाजातील प्रत्येक घटकालाच फटका बसला आहे. हा निर्णय कोणी एकट्याने घेतला की सामूहिक होता हे समजू शकलेले नसले तरी, हा सत्तेचा अधिकार केंद्रित करण्याचा एक भाग आहे. ज्या ठिकाणी मूठभर लोकांच्या हाती सत्ता केंद्रित होते तेव्हा ती भ्रष्ट होत जाते व अशी सत्ता घेत असलेले निर्णयही देशाला अराजकतेकडे नेतात, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. पवार पुढे म्हणाले, देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी करण्यात आलेले आॅपरेशन योग्य असले तरी, आॅपरेशननंतर ज्या पद्धतीने रुग्णाची काळजी घ्यायला हवी तसे न झाल्यामुळे रुग्ण दगावण्याचीच भीती आहे असे सांगून, पंतप्रधान मोदी जेव्हा दूरदर्शनवरून महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे जाहीर झाले तेव्हा असे वाटले की पठाणकोट, उरी व लष्कराच्या बेस कॅम्पवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे ते पाकिस्तानबद्दल ठोस निर्णय घेतील, परंतु त्यावर भाष्य न करता त्यांनी देशातील ८६ टक्के चलन रद्दी झाले म्हणून जाहीर केले. हे सांगत असताना पवार यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध छेडण्यापूर्वी आकाशवाणीवरून देशाला संबोधित केले होते
याची आठवण करून दिली. देशातील काळा पैसा नष्ट करण्याच्या विषयावर एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा झाली होती.
सध्याचे राष्ट्रपती व तत्कालीन वित्तमंत्र्यांनी त्यावेळी ७७ हजार कोटी रुपये काळा पैसा असल्याचे सांगितले होते. आत्ताच्या राजवटीत एक लाख ८६ हजार कोटी रुपये काळा पैसा चलनात फिरतो, असे सरकारचे म्हणणे आहे व म्हणून ते चलनातून रद्द केले, असे समर्थन केले जात असेल तर त्यातील ९८ टक्के रक्कम आता बॅँकेत जमा झाल्याचे प्रसिद्ध होत असल्यामुळे देशात नेमका किती काळा पैसा आहे, असा सवालही पवार यांनी केला.