शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर महाराष्ट्रात कोरोना मुक्तीचे प्रमाण 90 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:22 IST

नाशिक- उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्'ात गेल्या आठवडाभरात कोरोना बधितांची संख्या वाढली असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाण आता 90 टक्के झाले आहे. गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रात कोरोबाधितांची संख्या दोन लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेली असली तरी एकूण दोन लाख ५ हजार ९५ रुग्णांपैकी एक लाख ८४ हजार ६९५ रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने कोरोना मुक्त होण्याचे हे प्रमाण ९०.०४ टक्के झाले आहे. विभागात आतापर्यत ३९९९ बधितांचा मृत्यू झाला असून सरासरी मृत्यूदर १.९४ टक्के आहे. गत आठवड्याच्या तुलनेत त्यात घट झाली आहे. गेल्या आठवड्यात १.९९ टक्के इतका मृत्यू दर होता.

ठळक मुद्देमृत्यू दर घसरला: बाधित आढळण्याचे प्रमाण 31 टक्के

नाशिक- उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्'ात गेल्या आठवडाभरात कोरोना बधितांची संख्या वाढली असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाण आता 90 टक्के झाले आहे. गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रात कोरोबाधितांची संख्या दोन लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेली असली तरी एकूण दोन लाख ५ हजार ९५ रुग्णांपैकी एक लाख ८४ हजार ६९५ रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने कोरोना मुक्त होण्याचे हे प्रमाण ९०.०४ टक्के झाले आहे. विभागात आतापर्यत ३९९९ बधितांचा मृत्यू झाला असून सरासरी मृत्यूदर १.९४ टक्के आहे. गत आठवड्याच्या तुलनेत त्यात घट झाली आहे. गेल्या आठवड्यात १.९९ टक्के इतका मृत्यू दर होता.उत्तर महाराष्टात सर्वाधिक ८५ हजार ८२ रुग्ण नाशिक जिल्'ाात आढळले असले तरी यातील ७५ हजार ११३ रुग्ण करोनामुक्त झाले. आता पर्यंत १ हजार ५१३ जणांचा मृत्यू झाला. सध्या संपूर्ण जिल्'ात ८ हजार ४५६ रुग्ण उपचार घेत आहेत. जळगाव जिल्'ाात आतापर्यंत ५१ हजार रुग्ण आढळले असून त्यातील ४६ हजार ७१५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. १२२१ जणांचा मृत्यू झाला. सध्या सुमारे तीन हजार रुग्ण उपचार घेत आहेत. अहमद नगर जिल्'ाात रुग्ण संख्या ५० हजारावर गेली असली तरी एकूण बधितांपैकी ४५ हजार ६३८ रुग्ण बरे झाले तर ७७० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या संपूर्ण ३८१४ रुग्ण उपचार घेत आहेत. धुळे जिल्'ाात १३ हजार रुग्णांपैकी यापैकी ११ हजार ९६४ जण बरे झाले. तर ३६८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या या जिल्'ात ५५२ रुग्ण उपचार घेत आहेत. नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्'ाात करोनाबाधितांची संख्या सहा हजाराच्या जवळ असून यातील पाच हजार २६५ रुग्ण बरे झाले. १२७ जणांचा मृत्यू झाला. सध्या ५८७ रुग्ण उपचार घेत आहेत.बाधितांचे प्रमाण घटलेगेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात कोरोना बाधित आढळण्याचे प्रमाण घटले आहे ते ३१.८४ टक्क्यांवर आले आहे उत्तर महाराष्ट्रात मार्च महिन्यापासून आता पर्यंत सहा लाख ४४ हजार ३७ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या त्यात ३१.८४ टक्के संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर चार लाख ३५ हजार ३९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत .१ हजार २०९ अहवाल अनिर्णित असून २ हजार २१२ अहवाल प्राप्त झालेले नाहीत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल